प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन आनंदाचे डोही आनंद तरंगं

 प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा ११ वा  वर्धापनदिन  ६ जुलै २०१९ रोजी मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. स्कूलचे माजी विद्यार्थी तांत्रिक अभियंता शशांक तांबे, चार्टड अकौंटंट अदित्य मानधने, उत्पादन अभियंता अमोल थोरात, आर्किटेक्ट प्रेरणा कटारिया हे प्रमुख पाहुणे लाभले. प्रमुख पाहुण्यांचा यथोचीत सन्मान प्राचार्यांच्या शुभहस्ते पार पडला तसेच दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मिठाई वाटपाने कार्यक्रम गोड झाला.  मुलींसाठी संगित खुर्ची, चेंडूफेक तर मुलांसाठी रस्सीखेच असे उपक्रम राबवले. सदर प्रसंगी स्कूलचे प्राचार्य श्री सुशील शिंदे, उपप्राचार्य हेमांगी कसरेकर, निमसे सर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयामध्ये विद्यापीठाचे कृतीसत्र

लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त  विद्यमाने अहमदनगर जिल्ह्याचे बहिःशाल शिक्षण मंडळ, जेष्ठ नागरिक सहायता कक्ष , विद्यापीठाचे वक्ते ,ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राचे आयोजन बुधवार दि. १० ते गुरवार दि ११ जुलै २०१९ या कालावधीमध्ये करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर यांनी दिली. 

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात याच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून बहिःशाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. नवनाथ तुपे हे या दोन दिवस चालणाऱ्या कृतीसत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

 जिल्ह्यातील सर्व वक्ते,ग्रंथ अन्वेषक आणि केंद्रवाह  यांनी या चर्चा सत्रासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन महिला महाविद्यालयाच्या केंद्रवाह प्रा. अर्चना घोगरे यांनी केले आहे. 

Education Leadership Award

Pravara Rural Engineering College, Loni received “EDUCATION LEADERSHIP AWARD” 

The award is in recognition of leadership, development, marketing an institute and industry interface.

The 10th ABP NEWS National Education Awards 2019 are well researched and chosen by an independent jury and a panel of professionals who believe in nurturing Talent and in recognizing the best of the best …

Award was presented in a grand award ceremony on 4th July, 2019 at Taj Lands End, Bandra, Mumbai,  Mr.Kapil Tamhane & Mr. Digambar Rane received the honour on behalf of Dr. Sanjay Gulhane, Principal.

प्रवरेच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये उत्तुंग यश

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेंअंतर्गत नुकत्याच प्रवरा रूरल इंजिनीरिंग कॉलेज मध्ये संपन्न झालेल्या औरंगाबाद येथील हर्मन फिनोकेम लिमिटेड या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॅम्पस इंटरव्हिव्ह मध्ये  ४६ मुलांची नोकरीसाठी निवड केली असल्याची माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.  

     हर्मन फिनोकेम लिमिटेड या कंपनीतर्फे कंपनीचे मिस. नीलांजन भट्टाचार्य एच. आर. ए. पी. आय., एच. आर. मिस. स्वाती थोरात व त्यांची टीम इंटरव्ह्यूसाठी आली होती. यावेळी संस्थेतर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. इंटरव्ह्यूसाठी ११८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी संस्थेत शिकत असलेल्या ४६ मुलांची निवड करण्यात आली आहे. ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफीसर डॉ. आण्णासाहेब वराडे व प्रा. राजेंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती संपन्न झाल्या. .

     प्रा. धनंजय आहेर यांनी म्हणाली कि,  कि संस्थेचे अध्यक्ष.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मुलांच्या प्लेसमेंटसाठी महाविद्यालयात सतत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास तसेच मुलाखतीची तयारी करुन घेण्यावर भर असतो ज्यामुळे शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अधिक फायदा होत असतो. महाविद्यालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरॊबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत.या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच त्यांनी सांगितले कि आतापर्यंत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने अनेक नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहे व या पुढेही महाविद्यालय त्यासाठी काम करत राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रवरा रूरल इंजिनीरिंग कॉलेजचे सन २०१८-१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग व इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागाच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना  वेगवेगळ्या नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निकालापूर्वी नोकरी मिळाल्या आहे.
      वरील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.. राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा न. सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डो. सुजय  विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे  महासंचालक डॉ. यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, रजिस्ट्रार श्री. भाऊसाहेब पानसरे, सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळा संप्पन

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि गीता परिवार संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळा संप्पन झाली असून यामध्ये  पहिल्या टप्प्यात संस्थेच्या बेचाळीस माध्यमिक शाळांमधील सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांचा.  अभ्यासासाठी उत्साह वाढून, बुध्यांक आणि गुणांक वाढविण्याच्या उद्देशाने, दैनंदिन योग साधना करून घेण्यासाठी सुमारे नव्वद क्रीडा शिक्षकांना या कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

       गीता परिवाराचे श्री दत्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रवरा महिला शिक्षण संकुलातील गंगुबाई विखे पाटील इनडोअर स्टेडियम मध्ये संपन्न झालेल्या या ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळेचे उदघाट्न.  संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी  प्रवरा महिला शिक्षण संकुलाच्या संचालिका सौ. लिलावती सरोदे, संस्थेचे क्रीडासंचालक प्रा. अफजल पटेल,डॉ. उत्तमराव अनाप,प्रा. राहुल काळे यांचेसह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.   

       प्रा. दिगंबर खर्डे म्हणाले कि,  संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील  यांची असी संकल्पना होती कि, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिवसभर प्रफुल्लीत राहायचे असेल तर,योग साधना महत्वाची असून  खेळाच्या तासाप्रमाणेच  दैनंदिन परिपाठाच्या वेळेस विद्यार्थ्यांना योगसाधना देण्यात यावी त्या नुसार प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षक आणि एका शिक्षकांना गीता परिवारातील  योगा तज्ज्ञ प्रशिक्षकाद्वारे हे प्रशिक्षण देण्यात आले असून , आता या शिक्षकांकडून संस्थेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन योग् साधनादेण्यात येणार आहे.

       गीतापरिवाराचे श्री दत्ता सर म्हणाले कि, २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग् दिवस साजरा केला जात असला तरी, योग् हि भारतीय कला आहे. डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गीता परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या योग्य साधनेद्वारे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बुध्यांक आणि गुणांक वाढल्याचे सांगताना स्वतः योगाचार्य रामदेवबाबा यांनी येथील  मुलांची योगसाधना बघून समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. 

चौकट :- * प्रशिक्षित ९० योग दूतांद्वारे संस्थेतील माध्यमिक विभागातील सुमारे २३ हजार  विद्यार्थ्यांना त्या त्या शाळेत परिपाठाच्या वेळी  दैनंदिन १५ मिनिटे संगीतावर आधारित योगसाधना.

*  वर्षाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांचा  एकत्रित योग् साधना कार्यक्रम घेऊन चांगली योगसाधना करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार. इच्छुक ग्रामस्थांना हि  सहभागी करून घेण्यात येणार.

फोटो कॅप्शन :-लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि गीता परिवार संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळेंच्या उदघाटन प्रसंगी  गीता परिवाराचे श्री दत्ता सर, संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे , सौ. लिलावती सरोदे, सं प्रा. अफजल पटेल,डॉ. उत्तमराव अनाप.

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे मध्ये स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथि निमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना संस्थेचे सदस्य शशिकांत उर्फ आबासाहेब घोलप, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर. एकनाथ सरोदे,विलास वाणी, श्री शेगावकर आदी.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राज्य स्तरीय मायक्रोअरे तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन – विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करूनघ्यावे – दत्तात्रय पाटील शिरसाठ

विज्ञान जैवतंत्रज्ञान विकासासाठी अभ्यासात आलेले नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसाद करून नवीन नवीन गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे असे प्रतिपादन नियोजन समितीचे संचालक श्री दत्ता पाटील शिरसाठ यांनी केले.

     लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी व पद्मश्री विखे पाटील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज प्रवरानगर यांच्या डिजाईन इंनोवेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मेकइंटर आणि वेटलॅब चॅम्पियनशिप यांच्या अध्यक्षतेखाली कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे ‘मायक्रोअरे डाटा ऍनालिसीस इन क्रॉप डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेच्या  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बायोइन्फो रिसर्च फेलो टाटा मेमोरियल सेंटर, नवी मुंबई येथील श्री.जितेश दोशी, कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रा.ऋषिकेश औताडे,प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,प्रा.श्रद्धा रणपिसे, प्रा.अभिजित दसपुते, प्रा.मनीषा आदिक आदि मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी प्रा.ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले.

         डॉ.मधुकर खेतमाळस यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलतांना बायोइन्फोरमॅटिक (जैवमाहिती तंत्रज्ञान) अभ्यासात होणाऱ्या बदलाची माहिती करून दिली तसेच येणाऱ्या काळात नक्कीच या विषयावर करियर घेण्याची संधी नक्कीच वाढतील असे आवाहन केले. याचर्चासत्रामध्ये  महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातुन विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. त्यांना बायोइन्फो रिसर्च फेलो टाटा मेमोरियल सेंटर,नवी मुंबई येथील श्री.जितेश दोशी यांचे मार्गदर्शन केले.  

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील बायोइन्फो डिपार्टमेंट प्रा.श्रद्धा रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र होत आहे.

सूत्रसंचालक केदार सौरभ, कु.माने राणी यांनी केले तसेच स्वागत गीत कु.मेघना गुरव यांनी सादर केले व शेवटी आभार प्रा.घोरपडे भाऊसाहेब यांनी केले.

फोटो कॅप्शन :- पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या डिजाईन इंनोवेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मेकइंटर आणि वेटलॅब चॅम्पियनशिप यांच्या सयुक्त विद्यामाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे ‘मायक्रोअरे डाटा ऍनालिसीस इन क्रॉप डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी दत्ता पाटील शिरसाठ, श्री.जितेश दोशी, डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य. प्रा.ऋषिकेश औताडे,प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,प्रा.श्रद्धा रणपिसे, प्रा.अभिजित दसपुते, प्रा.मनीषा आदिक आदि 

कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये कृषिदिन साजरा

हरितक्रांतीचे प्रणेते असी ओळख असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कृषिदिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती. प्राचार्य सौ. अरुणा थोरात यांनी दिली.

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील पर्यावरणशास्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक एस. एस गौरखेडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये पर्यावरणाचा समतोल कसा राखावा तसेच पर्यावरण आणि शेती यांचा परस्परांशी असलेला संबंध या विषयी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी उपप्राचार्य एस. व्ही. भांड , प्रा जे.बी. ब्राम्हणे,प्रा. एन एस. लव्हाटे,प्रा. ए. एस. साळवे इतर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.

कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलन

लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कृषी-कवी संमेलनाचे उदघाटन प्रसंगी कवी डॉ. बाबुराव उपाध्ये, पोपटराव पटारे, श्रीमती संगीता फासाटे, कवी भास्कर दादा लगड, यशवंत पुलाटे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयासाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे प्रा. प्रवीण गायकर आदी.

सर्वच बाबतीत अनुकुलता असलेल्या भारत देशाकडे सर्वजगातील लोक आकर्षित होतात. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने भारताला शेतीप्रधान देश म्हटलं जाते, परंतु राजकारण,समाजकारण आणि अध्यात्मामध्येही शेती बद्द्ल प्रेम व्यक्त केलं जात असले तरी, नवीन पिढीचे शेती बाबतचे आकर्षण कमी होत असल्याची खंत प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केली.

लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. कार्यक्रमासाठी कृषी विद्यापीठाच्या रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी आणि कवी महाविरसिंग चव्हाण प्रवरा परिसरातील शब्द्धश्नेही शब्दस्नेही चे अध्यक्ष्य कवी भास्कर दादा लगड, ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार प्राप्त कवी यशवंत धोंडिबा पुलाटे, कवी पोपटराव पटारे, कवयत्री आणि सूत्रसंचालिका श्रीमती संगीता फासाटे, सूत्रसंचालिका आणि कवयत्री कु.शिवानी शिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले. .मुख्य समारंभापूर्वी माजी मुख्य मंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित `कृषी व औद्योगिक क्रांतीचे प्रणेते` ही 20 मिनिटाची चित्रफित दाखविण्यात आली.कृषी-कवी संमेलनाचे हे दुसरे वर्ष असून या कवीसंमेलनामध्ये सादर करण्यात येणाऱ्या कवितांचे एकत्रित पुस्तक तयार करण्यात येणार आहे.

कवी संमेलनाच्या अनुशंघाने विद्यार्थ्यांसाठी काव्य स्पर्धा आयोजित करण्यात अली होती यामध्ये मुख्यत्वे शेतकरी व कृषी क्षेत्राशी निगडीत कवितांचे सादरीकरण करण्यात आले त्यामध्ये कु. प्रेषिता यंदे, कु. ऋतुजा भालेराव, कु. स्नेहा हराळ, कु. आरती माळवदे, कु. प्रिया गवळी, कु. भावना शिंदे, कु.धनश्री साबळे, कु.ऋतुजा ढोकचौळे, कु.रुपाली ढोकचौळे, कु. दिप्ती शेळके यांनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या. या मध्ये प्रथम क्रमांक कु. ऋतुजा भालेराव, द्वितीय क्रमांक कु. प्रेषिता यंदे आणि तृतीय क्रमांक कु. स्नेहा हाराळ. यांना प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वांना पारितोषिके देण्यात आली. जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी हि शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीची मांडणी असलेली आपली कविता सादर केली.

यावेळी रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण गायकर, प्रा. अमोल सावंत, साहित्य सृजन ग्रुपचे अध्यक्ष सौरभ केदारी,प्रशांत बटुळे,,गौतम पाटेकर,कु. भावना शिंदे, कु. स्वामींनी नवले, कु. निकिता म्हस्के आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

औषधाच्या होणार्या गैरवापर विरोधी आंतरराष्ट्रीय दिन

औषधाच्या होणार्या गैरवापर विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानामित्त लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयामध्ये प्रवरा औषध निर्माण शास्र महाविद्यालयाच्या वतीने औषधांचे होणारे गैरवापर, त्यातून होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

या चर्चा सत्रासाठी विद्यालयातील सर्व विध्यार्थी- विध्यार्थिनी तसेच मुख्याधापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते . यावेळी महाविद्यालयाचे मुख्याधापक निवृत्ती येणगे यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा.डॉ. संजय भवर यांनी औषधांचे होणारे गैरवापर, त्यातून होणारे दुष्परिणाम अधोरेखीत करून त्यासंबंधित मार्गदर्शन केले त्यात त्यांनी औषधांचा होणारा गैरवापर कसा टाळावा व मानवी जिवनावर होणारे दुष्परिणाम कसे टाळावे यासंबंधी जनजागृती केली, सदर सत्राचे आभार प्रा. मयूर भोसले यांनी मानले.

योग्य मार्गदर्शन, मेहनत, आणि स्मार्ट स्टडी ही यशाची गुरुकिल्ली

आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडतीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असताने आयुष्यातील आनंदही अनुभवावा,असे प्रतिपादन लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी भाग्येश जावळे यांनी नुकतीच महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी विदयार्थींशी संवाद साधताना आयुष्यात छंद ही जोपासण्याचा सल्ला दिला.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “माजी विद्यार्थी संवाद” या कार्यक्रमा अंतर्गत भाग्येश जावळे बोलत होते. श्री जावळे हे सध्या सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणुन मंत्रालय मुंबई येथे कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील विविध संधी, त्यांची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टी आत्मसाद कराव्यात, नियोजन कसे करावे या विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

विदयार्थीशी बोलताने भाग्येश जावळे म्हणाले की, कठोर मेहनतीने तुमची परिस्थिती बदलू शकते, म्हणून आत्ताच नियोजन करा आणि कामाला लागा अन्यथा नियोजन किंवा परिश्रम करण्यात चुकलात तर पश्चात्ताप बाकी राहतो म्हणून योग्य मार्गदर्शनाचा वापर करत स्मार्ट स्टडी करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्याक्रमाचे प्रस्ताविक महाविदयालयाचे प्राचार्य प्रा. ऋषीकेश औताडे यांनी केले, सुत्रसंचालन सौरभ केदार यांनी केले तर महाविदयालयाच्या माजी विदयार्थी समन्वयक प्रा. सारिका पुलाटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विदयार्थी, शिक्षक व शिक्षक्केतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “माजी विद्यार्थी संवाद” या कार्यक्रमा अंतर्गत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी आणि सध्या सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणुन मंत्रालय मुंबई येथे कार्यरत असलेले भाग्येश जावळे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असतांना स्टाफ बरोबर .

प्रवरेत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न – शिक्षणाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करा-सौ.सुजाता थेटे

लांबी,रुंदी आणि खोली शिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही, आपल्या जीवनाचे हि तसेच आहे. असे सांगताना तरुण पिढीने दीर्घ जीवणासाठी प्राप्त केलेल्या ज्ञान आणि अर्थार्जतुन दुसऱ्याला मदत होईल या भावनेने काम केले तरच शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाता थेटे यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी यथे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी सौ. सुजाता थेटे बोलत होत्या.या प्रसंगी कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे,सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ.मिनल शेळके, प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.महेश चंद्रे, प्रा.निलेश सोनुने, प्रा.स्वरांजली गाढे आणि आणी शिक्षक उपस्थित होते.

सौ.सुजाता थेटे म्हणाल्या कि, जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणतीही वस्तू पूर्ण केव्हा होते तर जेव्हा लांबी, रुंदी आणि खोली असते तेव्हा आपल्या जीवनातही निर्मिती पूर्ण झाल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, यानिमित्त लांबी म्हणजे दीर्घ जीवन, रुंदी म्हणजे ज्ञानप्राप्ती करा पदव्या प्राप्त करा आणि पैसे मिळवा, खोली म्हणजे दुसऱ्या काही करणे आपले ज्ञान पदव्या,पैसा यातील काही भाग तरी दुसऱ्याच्या भल्यासाठी उपयोग होयला आहे तरच तुमच्या शिक्षणाचा फायदा होईल असे त्या म्हणाल्या.

यावेळी प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेतले आहे त्या बळावर त्यांनी आपल्या स्वत:चा अवकाश निर्माण करावा, केवळ नशीबावर अवलंबून न राहता आपली क्षमता दाखवून द्यावी व उच्च ध्येय ठेऊन पुढच्या काळासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाबरोबर सर्वांगिण विकास महत्त्वाचा आहे. समाजात उपयोगी आयुष्य जगतांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तसेच ज्ञानाला शालिनतेचि जोड मिळाल्यास आदर्श व्यक्तीमत्व घडतील असे प्रतिपादन प्रा.गायकर यांनी केले.

अंतिम वार्षितील विद्यार्थी सोनाली बनकर,विद्या वर्धीनी,आभा मुसळे, अश्विनी सोळुंके,सौरभ फुलपगार,अतुल जांभुळकर, सौरभ भालके,चेतन मोरे यां विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून निरोप समारंभात गहिवरून आले व या महाविद्यालयात येऊन आम्हाला आमचे शाळेतील दिवस आठवले व येथे खूप नविन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या व परत या महाविद्यालयात येता येणार नाही याची पण खंत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.सूत्र संचालक तृतीय वर्षातील विद्यार्थी स्वप्नील गावडे व प्रेषिता यंदे यांनी केले व शेवटी आभार प्रा.सिताराम वरखड यांनी मानले.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. सुजाता थेटे,संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे, प्रा.सौ.मिनल शेळके, प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.महेश चंद्रे, प्रा.निलेश सोनुने, प्रा.स्वरांजली गाढे आदी.