कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील रासेयोचा ५०० वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम

मानवाने विकासासाठी निसर्गाचा केलेला ऱ्हास आणि पर्यायाने  निसर्गाचा ढासळलेला समतोल रोखण्यासाठी तसेच मानव जातीच्या उज्वल भविष्यासाठी पृथ्वीला तिचे गेलेले वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी  वृक्षसांगोपान होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांच्या संकल्पनेतून रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदशनखाली एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम हाती घेऊन गोगलगाव रोड येथील परिसरात ५०० झाडांची  लागवड करण्यात आली या प्रसंगी डॉ. खेतमाळस बोलत होते. याप्रसंगी  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, संचालक अप्पासाहेब दिघे साहेब,लोणी खुर्द गावच्या सरपंच मनीषा आहेर,  उपसरपंच श्री. सुवर्णा घोगरे,ग्रामविकास अधिकारी संतोष ठिगळे,कामगार तलाठी श्री.कोळगे ,सामाजिक वाणीकरणाचे फॉरेस्ट रेंज अधिकारी बबनराव फटांगरे,  तालुका कृषि मंडळ अधिकारी नारायण लोळगे,सर्व शिक्षक वृंद आणि रासेयो चे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.मधुकर खेतमाळस म्हणाले कि,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंगोपन केले पाहिजे, वृक्षांमुळे शुद्ध हवा मिळते तसेच प्रदूषण रोखले जाते, आजारांपासून बचाव: दम्याची शक्यता ३३% कमी होते, हवा शुद्ध करून फुप्फुसाचा बचाव करते अश्या विविध फायदे होतात म्हणून वृक्षसांगोपान होणे गरजेचे आहे असे असे ते म्हणाले.            

राहता कृषि मंडळ अधिकारी  नारायण लोळगे म्हणाले की,   वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही   प्रत्येक नागरिकाची जाबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती स्वीकारली पाहिजे असे सांगताना कृषीजैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.            

कार्यक्रम यशस्वी  पार पाडण्यासाठी प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे,प्रा.विशाल, केदारी,प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.मिनल शेळके,प्रा.स्वरांजली गाढे,प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनीषा आदिक, प्रा.श्रद्धा रणपिसे, रा.सो.यो चे सर्व स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

फोटो कॅप्शन ;- लोणी येथील  कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांच्या संकल्पनेतून रासयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांच्या मार्गदशनखाली एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम हाती घेऊन गोगलगाव रोड येथील परिसरात ५०० झाडांची  लागवड करण्यात आली या प्रसंगी सहसचिव भारत घोगरे,डॉ.मधुकर खेतमाळस, संचालक अप्पासाहेब दिघे साहेब, सरपंच मनीषा आहेर,  उपसरपंच सुवर्णा घोगरे, संतोष ठिगळे,श्री.कोळगे , बबनराव फटांगरे,  नारायण लोळगे  आदी.