ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना पोलीस आणि सैन्‍य भरती प्रक्रीयेसाठी असलेले शारिरीक आणि बौध्‍दीक प्रशिक्षण स्‍थानिक पातळीवरच उपलब्‍घ करुन देण्‍यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने १४ प्रशिक्षण केंद्रांची सुरुवात…

राज्‍यात पोलीस भरती प्रक्रीया सुरु झाल्‍यानंतर ग्रामीण भागातील असंख्‍य तरुण तरुणी या भरती प्रक्रीयेसाठी शहरातील प्रशिक्षण केंद्राकडे आकर्षित होवून तिथे आपला प्रवेश घेतात. मात्र या विद्यार्थ्‍यांना राहाण्‍याची सुविधा उपलब होत नाही. आशा पार्श्‍वभूमीवर निर्माण होणारी अडचण दुर करण्‍यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून प्रशिक्षण केंद्राची उभारणी करुन, पोलीस, सैन्‍य भरती प्रक्रीयेतील इच्‍छुक विद्यार्थ्‍यांना संधी उपलब्‍ध करुन दिली आहे.
मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून संस्‍थेची महाविद्यालये असलेल्‍या १४ गावांमध्‍ये ही प्रशिक्षण केंद्र सुरु झाली आहेत. केंद्रामध्‍ये दाखल झालेल्‍या विद्यार्थी, विद्यार्थींनींना रोज सकाळी आणि संध्‍याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत मैदानावर शारिरीक प्रशिक्षण दि‍ले जाते. या मध्‍ये प्रामुख्‍याने धावणे, गोळाफेक, लांब उडी, सुर्य नमस्‍कार, योगासने अशा क्रिडा प्रकारांचा समावेश असून यासाठी संस्‍थेतील क्रीडा शिक्षक विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. बाहेरील मार्गदर्शकांनाही यासाठी नियुक्‍त करण्‍यात आले असून, त्‍यांचेही मार्गदर्शन या विद्यार्थ्‍यांना उपयुक्‍त आणि महत्‍वपूर्ण ठरत आहे.

प्रशिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या वतीने दररोज केळी, अंडी आदि दूध यांचा नाष्‍टा सकाळी मोफत स्‍वरुपात देण्‍यात येतो. दुपारच्‍या वेळी या विद्यार्थ्‍यांना बौध्दिक आणि स्‍पर्धा परिक्षांसाठी उपयुक्‍त असलेले शैक्षणिक मार्गदर्शनाची सुविधाही महाविद्यालयांमधून निर्माण केली आहे. केवळ पोलीस आणि सैन्‍य भरती नाही तर शासनाच्‍या सरळ सेवा भरती प्रक्रीयेत आवश्‍यक असलेल्‍या सर्वच स्‍पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन तज्‍ज्ञ मार्गदर्शकांकडून देण्‍यात येत आहे. डिसेंबर २०२२ पासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने हा उपक्रम सुरु केलेला उपक्रम भविष्‍यातही कायमस्‍वरुपी सुरु ठेवण्‍याचा मानस मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना स्‍थानिक पातळीवरच हे प्रशिक्षण मोफत उपलब्‍ध झाल्‍याने याचा मोठा दिलासा विद्यार्थी, विद्यार्थींनींना मिळाला असून, आत्‍तापर्यंत ६१९ विद्यार्थी या केंद्रामध्‍ये दाखल झाले आहेत.