शिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे

शिक्षणा सोबतच विवेकी विचार निर्भयता आणि व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे मत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संम्मेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

 प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूह आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्याच्या  पारितोषिक वितरण कार्यक्रमात भारत सासणे बोलत होते. संस्थेचे सहसचिव  भारत घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास विखे पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजित भागडे, कार्यालय अधिक्षक मधुकर चौधरी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे,प्रा. नंदु दळे, डॉ. अण्णासाहेब तांबे आदी उपस्थित होते. 

आपल्या मार्गदर्शनात भारत सासणे म्हणाले आजची तरुण पिढी ही स्वप्न बघणारी आणि स्वनपुर्ती करण्यासाठी कायम सक्षम असलेली पिढी आहे. विद्यार्थीनी कला, संस्कृती, वाचन चिंतन करतांना त्यावर विचारमंथन केले पाहीजे आभासी, चांगुळ पणा, उत्तम विचार, आनंदी जीवन यांचा समतोल  आयुष्यासाठी गरजेचा आहे.मूल्यव्यवस्था आणि व्यक्तीमत्व आणि आव्हाने मोठी असली तरी यातील संधी शोधण्याची गरज आहे. सत्यचा आवाज हा कायम ठेवतांना  निर्भयता, विवेकी विचार, व्यासंगवृत्ती जीवनाचा पाया असल्याचे  सासणे यांनी सांगून विद्यार्थी हा साधक असला पाहीजे. शालेय ज्ञानाबरोबरचे ग्रंथ संपदा वाचन यांतून आपली आपले ध्येय साथ करतांना सर्व साहित्याचे वाचन करावे जगात पोहण्यासाठी आणि जागतिकरणाच

भूत डोक्यात न ठेवता त्यास आव्हान न मानता ज्ञानाची साधना, नवीन रस्ते आणि उपलब्ध ज्ञान यातून आपण कसे प्रबळ होत राहू याचे प्रयत्न प्रवरा शैक्षणिक संस्थेतून होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.