कृषी महाविद्यालय लोणी आणि गोगलगाव,लोणी खुर्द,आडगाव ग्रामपंचायतींच्या संयुक्तविद्यमाने जलशक्ती अभियान अंतर्गत विहीर पुनर्भरण कार्यक्रमासाठी साठी उत्स्फूर्त प्रतिसाद

भूगर्भातील पाणी पातळी उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०१९-२० अंतर्गत सुरु केलेल्या जलशक्ती अभियान या योजने अंतर्गत राहाता  पंचायत समितीच्या वतीने मौजे गोगलगाव,लोणी खुर्द, आडगाव या गावात नुकताच विहीर पुनर्भरण कार्यक्रम घेण्यात आला  लोणी येथील कृषी महाविद्यालययांच्या सयुंक्त विद्यमाने हाती घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती  कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

सन २०१८-१९ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत निवड व दुरुस्ती झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विहीर पुनर्भरण हि संकल्पना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगण्यात आली. सदर महत्वकांक्षी कार्यक्रम राज्याचे गृह निर्माण मंत्री  ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा  ना.सौ. शालिनीताई विखे पाटील,खासदार  डॉ. सुजय विखे पाटील तसेच लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित)प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या संकल्पनेतून पार पाडण्यात आला. या कार्यक्रमास राहाता पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री. समर्थ शेवाळे , संस्थेचे सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे,व प्राचार्य प्रा. निलेश दळे आदींचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री.जी. आर. कदम व विस्तार अधिकारी (कृषी)श्री. प्रवीण चोपडे यांनी कृषी  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जलशक्ती अभियानाचे महत्व समजून सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालाचे प्रा. रमेश जाधव, प्रा. अमोल खडके व डॉ. गोविंद शिऊरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

फोटो कॅप्शन:-कृषी महाविद्यालय लोणी आणि  गोगलगाव,लोणी खुर्द,आडगाव ग्रामपंचायतींच्या संयुक्तविद्यमाने जलशक्ती अभियान अंतर्गत विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविताना महाविद्यालयाचे प्राध्यापक  आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी

फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल ची विजयी सलामी!

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आयोजित व गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर येथे खेळवल्या गेलेल्या जिल्हास्तरीय सतरा वर्षे वयोगटातील फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात आत्मा मलीक स्कूल संघाचा दोन झिरो गोल फरकाने पराभव करत प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला असल्याची माहिती  प्राचार्य सुशील शिंदे यांनी दिली.

या स्पर्धा दिनांक ९ व १० सप्टेंबर २०१९ दरम्यान पार पडल्या. सतरा वर्षे वयोगटात अहमदनगर जिल्ह्यातील ३० संघांनी सहभाग घेतला होता. सेमी फायनलमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलचा ३-० गोलने पराभव करुन पीसीपीएस संघाने मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये आत्मा मलिक स्कूलला २-० गोलने धूळ चारत प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल संघाने विजयी सलामी दिली. सदर खेळाडूंना प्रशिक्षक रवींद्र भणगे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी स्पर्धकांचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, शाळेचे डायरेक्टर के जगन्नाथन, उपप्राचार्य हेमांगी कसरेकर, निमसे सर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन :-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित,गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर येथे खेळवल्या गेलेल्या जिल्हास्तरीय सतरा वर्षे वयोगटातील फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात आत्मा मलीक स्कूल संघाचा दोन झिरो गोल फरकाने पराभव करत विजयी ठरलेला प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा संघ.

वादविवाद स्पर्ध्ये

प्रवरा पब्लीक स्कुलमध्ये पार पडलेल्या इंटरहाऊस हिंदी  वादविवाद स्पर्ध्ये मध्ये शिवाजी हाऊसमाधी कु. नेहा दुबे  या विद्यार्थिनीने प्रथम तर, तानाजी हाऊसच्या कु. ख़ुशी चौहान द्वितीय तर सरदार पटेल हाऊसचा प्रतीक रिंगे याने तृतीय क्रमांक  मिळविला असल्याची माहिती प्राचार्य सयाराम शेळके यांनी दिली.

या स्पीच स्पर्ध्ये मध्ये सारख्या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींचे चरित्र आणि विचारांची ओळख होते. या मुले विद्यार्थीदशेतच सर्वांगीण व्यक्तिमत्व तयार होण्यास मदत होते. या विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक कर्नल डॉ. के. जगन्नाथन आणि शिक्षकांनी अभिनंदन केले. 

पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रवरा कृषीजैवतंत्रज्ञान, सिमॅसेस लर्निंग एलएलपी, पुणे व म.फु.कृ वि यांच्यामध्ये सामंजस्य करार

कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि  सिमॅसेस लर्निंग एलएलपी पुणे, या संस्थेच्या पुढाकारातून कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार झाला असल्याची माहिती कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस यांनी दिली.

केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषिक्षेत्रात व्यावसाईक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक युवतींना मोफत रोजगरक्षम वयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयापैकी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची निवड झाली असल्याचे  प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांनी सांगितले.

या कोर्ससाठी श्री.अंकित माहेश्वरी प्रोजेक्ट हेड सिमॅसेस पुणे, श्री.अमोल बिरारी मॅनेजर सकाळ ग्रुप आणि श्री.दिलीप क्षिरसागर स्किल डेव्हलेपमेंट समन्वयक म.फु.कृ.वि. राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात आहे.तसेच या करारासाठी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट अधिकारी प्रा. महेश चंद्रे, स्किल डेव्हलपमेंट समन्वयक प्रा.स्वप्नील नलगे तसेच प्रा.अमोल सावंत यांनी विशेष परिश्रम घेणार आहे.

दोन महिन्याचे प्रशिक्षण हे निशुल्क असून, पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, भारत सरकार यांचे द्वारे प्रमाणपत्र असून रोजगार मिळण्यापर्यंत मदत केली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ऍग्री पॉलिटेक्निक डिप्लोमा / ऍग्री टेक्निकल स्कुल सर्टिफिकेट / १२ वी (विज्ञान पास) याना प्राधान्य दिले जाणार आहे.  त्याच अनुषंगाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी मध्ये या प्रशिक्षणाला सुरुवात येत्या १५ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यामध्ये कृषी विस्तार सेवा प्रदाता (अग्री एक्सटेंशन ऑफिसर) आणि दुग्ध उत्पादक/उद्योजक (डेरी फार्मर/इंटरप्रेणुर) या दोन विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

नावनोंदणी सुरू झाली असून, वरील पैकी आवडत्या एका विषयाचे ज्ञान घेण्यासाठी बेरोजगार तरुण, गरजू विद्यार्थी यांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा व अधिक माहितीसाठी (९८६०७४३९६१,८६००९०३९६१) या मोबाईल वर संपर्क करण्याचे आवाहन सिमॅसेस लर्निंग एलएलपी संस्थेचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामधील प्रशिक्षण समन्वयक श्री.ऋषिकेश तांबे यांनी केले.या कराराबद्दल राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,युवा नेते खासदार सुजय विखे पाटिल,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, सहसचिव श्री.भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, अतांत्रिक विभागाचे प्रा.दिगंबर खर्डे,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,तांत्रिक विभागाचे संचालक डॉ.के.टी.व्ही रेड्डी,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर आदिंनी अभिनंदन केले.

मेजर जनरल गजेंद्रसिंग यांची कॅम्पला भेट

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ ऑगस्ट पासून सुरु असलेल्या एन सी सी. ‘थल सैनिक कॅम्प’मध्ये महाराष्ट्रातील सुमारे १ हजार ६०० मुलींनी सहभाग घेतला.यातील ४० एन सी सी. छात्रांची दिल्ली येथे होणाऱ्या शिबिरासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली असून नुकतीच महाराष्ट्र एन सी सी प्रमुख मेजर जनरल गजेंद्रसिंग यांनी या कॅम्पला भेट देऊन छात्रांना मार्गदर्शन केले.

औरंगाबाद विभागाचे एन सी सी.ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मोहिते आणि ७ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अनुपम रंधवा यांनी मेजर जनरल गजेंद्रसिंग यांचे स्वागत केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, पदमश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, रजिस्टर संजय मिसाळ, एन सी सी.ऑफिसर कॅप्टन सुजाता थोरात-देवरे .लेप्टनंट डॉ. राजेंद्र पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

मेजर जनरल गजेंद्रसिंग यांनी या शिवाराची पाहणी करून शिबिरामध्ये सहभागी झालेल्या छात्रांशी संवाद साधला. ग्रामीण भागात असूनही पदमश्री विखे  पाटील महाविद्यालयाने या १६०० मुलींना उपलब्ध केलेल्या सुविधांबद्दल विशेष कौतुक केले.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या एन सी सी. ‘थल सैनिक कॅम्प’मध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे १ हजार ६०० मुलींना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र एन सी सी प्रमुख मेजर जनरल गजेंद्रसिंग, एन सी सी.ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मोहिते, कमांडिंग ऑफिसर कर्नल अनुपम रंधवा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, पदमश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, रजिस्टर संजय मिसाळ, एन सी सी.ऑफिसर कॅप्टन सुजाता थोरात-देवरे .लेप्टनंट डॉ. राजेंद्र पवार आदी. 

चैतन्य कुलकर्णी याने नगर जिल्ह्याचे नेतृत्व करताना प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक

गोंदिया येथे घेण्यात आलेल्या 13 व्या महाराष्ट्र राज्य पॅरालंपिक जलतरण स्पर्धेमध्ये लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आश्वी येथील कला वाणिज्य विज्ञान व संगणक महाविद्यालयातील  दिव्यांग असणारा चैतन्य कुलकर्णी याने नगर जिल्ह्याचे नेतृत्व करताना प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले. त्याची नॅशनल स्विमिंग चॅम्पीयमसाठी निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धे मध्ये महाराष्ट्रातून विविध  २५ जिल्ह्यातील  दिव्यांग स्पर्धक सहभागी  झाले होते. या मध्ये नगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी देखील सहभाग नोंदवला गेला होता, राहाता तालुका येथील दिव्यांग असणारा चैतन्य कुलकर्णी याने अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व केले. चोख कामगिरी बजावत बेस्ट स्ट्रोक १०० मीटर या ईव्हेट मध्ये  घेत प्रथम  क्रमांकाचेसुवर्ण पदक त्याने पटकवून अभिमानास्पद कामगिरी बजावली.. तसेच  फ्री स्टाईल मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. पुन्हा एकदा चैतन्य कुलकर्णी याने   बेस्ट स्ट्रोक मध्ये परत प्रथम क्रमांचे पारितोषिक मिळवून नगर जिल्ह्याचे  राहाता तालुक्याचे नाव रोषण करत विक्रम नोंदवला.चे सर्व अहमदनगर जिल्ह्यातुन कौतुक होत आहे. चैतन्य याला विलास दावणे यांचे मार्गदर्शन लाभले.

दाढ येथील गरीब कुटुंबातील असलेल्या चैतन्य कुलकर्णी या विद्यार्थ्याला विविध स्पर्ध्ये मध्ये सहभाग घेता यावा यासाठी गृहनिर्माण मंत्री  ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या तीन महिन्यानपासुन  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील जलतरण तलावामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी विना शुल्क परवानगी दिली होती. त्यामुळे त्याचा अत्मविश्वास वाढला असुन त्याने हे यश संपादन केले असल्याचे चैतन्य कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच त्याचे  मामा नरेंद्र पोळ, मोठा भाऊ अक्षय कुलकर्णी, संचालक देवीदास भारत पा.तांबे, प्रताप सखाहारी तांबे, कोच शिवाजी महागोविंद व सैनिकी स्कुल येथील श्री शेख, श्री  चेचरे , समीर  विखे,क्रीडा शिक्षक  प्रा प्रमोद विखे आणि परिसरातील नागरिकांचे यांचेही सहकार्य लाभले. चैतन्य ची  नॅशनल स्विमिंग चॅम्पीयमसाठी देखील निवड करण्यात आली आहे व हि स्पर्धा झाल्यानंतर त्याचा  मेड़ल व सर्टीफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.

पावसाळी शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन

सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करीत असते म्हणूनच खेळ जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे प्रतिपादन पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तुकाराम पाटील बेंद्रे यांनी केले.

बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ विठ्ठल राव एकनाथराव विखे पाटील विद्यालयात  पावसाळी शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन तुकाराम पाटील बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले त्या विखे ते बोलत होते. या प्रसंगी  मारुती गोरे , क्रिडा शिक्षक श्री सुनिल गागरे, श्री टावरे सर, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री प्रा बाबा वाणी,सचिव श्री बेंद्रे सर उपाध्यक्ष श्री मगर सर राष्ट्रीय पंच श्री बबन सातकर,श्री सुनील आहेर,अरूण झुराळे,राहुल काळे,संदिप हारदे,संदिप निबे, सय्यद सर,रोहकले सर,अंत्रे सर घोलप सर व प्रमोद देशमुख आदी उपस्तित होते.प्राचार्य श्री डेंगळे सर यांनी प्रास्ताविक केले.

या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजूरी मुलांच्या संघाने मिळवला.व 17वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक प डॉ वि ए विखे पाटील विद्यालय, बाभळेश्वर मुलांच्या संघाने मिळवला.19वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक पि.व्हि.पी.ज्युनियर महाविद्यालयातील मुंलाच्या संघाने मिळवून राहता तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. मुलीच्या खो खो स्पर्धेत 14 व 17 वर्ष वयोगटातील प्रथम क्रमांक इंग्लिश मिडीयम स्कूल लोणी संघाने मिळवला. तसेच 19 वर्ष मुलींच्या वयोगटातील प्रथम क्रमांक श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,राजूरी सघांने मिळवला.

श्री तुकाराम पाटील बेंद्रे यांनी या वेळी खेळाचे जीवनात अन्यन साधारण महत्त्व आहे हे स्पष्ट केले, तसेच जे मुले खेळात सहभागी होतात ती मूले जीवनात आनंद निर्माण करतात व यशस्वी होतात व निरोगी जीवन जगतात हे स्पष्ट केले .

फोटो कॅप्शन;- बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ विठ्ठल राव एकनाथराव विखे पाटील विद्यालयात  पावसाळी शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी तुकाराम पाटील बेंद्रे ,संचालक मारुती गोरे, क्रिडा शिक्षक श्री सुनिल गागरे, श्री टावरे सर, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री प्रा बाबा वाणी,सचिव श्री बेंद्रे सर उपाध्यक्ष श्री मगर सर राष्ट्रीय पंच श्री बबन सातकर,श्री सुनील आहेर,अरूण झुराळे,राहुल काळे,संदिप हारदे,संदिप निबे, सय्यद सर,रोहकले सर,अंत्रे सर घोलप सर व प्रमोद देशमुख आदी.

विज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. – डॉ. यशवंत थोरात

विज्ञानामध्ये केवळ दुसऱ्याचे विचार प्रमाण मानून पुढे जाता येत नाही. तर, त्या साठी स्वतःला काही तरी नाविन्यपूर्ण आणि ठोस वैचारिक अधिष्ठान असणे गरजेचे आहे. असे सांगताना,भारताने केवळ वैज्ञानिक सामर्थ्यावरच चांद्रयान(२) मोहीम यशस्वी केली.म्हणूनच  जगातील प्रत्येक सजीवांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची शक्ती विज्ञानात आहे. असे प्रतिपादन लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे(पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक आणि यांनी केले.

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करताना डॉ. थोरात बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे ,संस्थेचे  शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे,वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रामदास बोरसे यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. थोरात यावेळी म्हणालेकी, विज्ञानाशिवाय मानवाची प्रगती शक्य नाही.  उसने ज्ञान घेऊन मानवाला प्रगती करता येणार नाही त्यासाठी खडतर परिश्राम घ्यावे लागतात . म्हणूनच विज्ञान हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असल्याचे ते म्हणाले.

दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी डॉ. महेश खर्डे,डॉ. अनिल वाबळे,डॉ. बाळासाहेब मुंढे यांच्यासह सहकारी प्राध्यापक विशेष परिश्राम घेत आहे.

फोटो कॅप्शन ;-लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करताना नाबार्डचे माजी चेअरमन डॉ.यशवंत  थोरात. समवेत  प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे ,प्रा. दिगंबर खर्डे, डॉ. रामदास बोरसे, डॉ. महेश खर्डे,डॉ. अनिल वाबळे,डॉ. बाळासाहेब मुंढे आणि विद्यार्थी.

तलवारबाजी स्पर्धेमध्ये कु. हर्षदा नाईक या विद्यार्थीनेने व्दितीय क्रमांक

कोकमठाण येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरची कु. हर्षदा नाईक या विद्यार्थीनेने व्दितीय क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्या सौ. भारती कुंकर यांनी दिली.

कु. हर्षदा नाईक या खेळाडूला आता विभागीय स्पर्धे मध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे . विद्यालयाच्या कॅम्पस संचालिका सौ. लीलावती सरोदे क्रीडा संचालिका सौ विद्या गाडे यांचे मार्गदर्शन लाभले .

या विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष ना.  श्री.राधाकृष्ण विखे पाटील, महासंचालक डॉ .यशवंत  थोरात, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा ना. .शालिनीताई विखे पाटील,  खासदार डॉ.सुजय विखे, , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे, टेक्निकल डायरेक्टर डॉ.रेड्डी, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे ,कॅम्पस संचालिका सौ. लीलावती सरोदे    शिक्षकांनी अभिनंदन केले.

एन.सी.सी शिबिर ४०० मुली सहभाग

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ गर्ल्स बटालियन औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी शिबिरे सुरु असून एकून च्यार टप्प्यात होत असलेल्या या एकून बिरातील पहिल्या टप्प्यात महारातील सुमारे ४०० मुलीनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती लेप्टनंन्ट डॉ. राजेंद्र पवार यांनी दिली.

औरंगाबाद येथिल ग्रुप कमांडर ब्रिगेडियर श्री मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडंट कर्नल अनुपम रंधावा सुभेदार मेजर बलवरसिंग,जसपालसिंग थापा,  गंगा,सोहनलाल ,अजय साहू ,श्री ताठे हे साबीर घेण्यासाठी काम करीत असून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय थोरात,डॉ. रामचंद्र रसाळ, सौ. छाया गलांडे, एन.सी.सी ऑफिसर कॅप्टन सौ, सुजाता देव्हारे,यांच्या सहकार्याने एकून चार टप्यामध्ये हे शिबीर पार पडणार आहेत.

या शिबिरामधील पहिल्या टप्प्यात  सहभाग घेतलेल्या ४० मुलींची दिल्ली येथे होणाऱ्या ‘थल सेने कॅम्प साठी महाराष्ट्र निदेशलयातर्फे निवड करण्यात आली आहे. शिबिरामध्ये निवड झालेल्या मुलींसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. या मध्ये प्रामुख्याने फायरिंग ऑप्स्टाकल,म्याप रिडींग,टेन्ट पिचिंग,हेअल्थ व हायजीन, जजींग,डीस्टम्स,आदींचा समावेश आहे. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या मुलींना एन.सी.सी ए बी सी. प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कलागुनकार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . विखे पाटील महाविद्यालयाच्या वतीने राहण्याची आणि जेवणाची सोया करण्यात अली. आहे.

फोटो कॅप्शन :- लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ७ गर्ल्स बटालियन औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी शिबिरे सुरु असून एकून च्यार टप्प्यात होत असलेल्या या शिइकून बिरातील पहिल्या टप्प्यात महारातील सुमारे ४०० मुलीनी सहभाग नोंदवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जलशक्ती अभियाना साठी लोकसहभाग द्यावा- ना.सौ. शालिनीताई विखे पाटील

दुष्काळाची झळ बसलेल्यांनाच पाण्याची किंमत कळते. भविष्यात युध्द  पाण्यावरूनच होतील हे लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे यांनी ओळखले होते म्हणूनच पाण्यासाठी त्यांनी गावपातळी पासून देश पातळीवर पाणी प्राश्नावर आवाज उठविला होता.  असे सांगताना, आता प्रत्येक योजनांसाठी शासनावर  अवलंबून राहण्यापेक्षा जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर असलेल्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील  जलशक्ती अभियान राबविण्यासाठी लोकसहभाग द्यावा असे आवाहन  जिल्ह्या परिषदेच्या  अध्यक्षा ना.सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स ) अंतर्गत कृषी विभाग महाराष्ट्र  सहकार्याने आणि जलशक्ती मंत्रालय (पेयजल व स्वच्छता विभाग भारत सरकार )द्वारा संचालित बाभळेश्वर  केलेल्या जलशक्ती मेळावा व मिनी प्रदर्शन कार्यक्रमाचे उदघाट्न करताना ना.सौ शालिनीताई विखे पाटील  होत्या. या प्रसंगी रक्षामंत्रालयातील विभागीय आयुक्त आणि केंद्रशासनाने निरीक्षक अभिशांत पांडा जिल्हा कृषी अधिक्षक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ . सुधाकर बोऱ्हाळे,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी भारत घोगरे,  आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ.संभाजी नालकर यांनी प्रास्थाविक केले. या वेळी डॉ. धनंजय धनवटे,संपतराव वाघचौरे,कैलास पठारे, उद्धवराव मोटे, संजय राऊत,प्रसाद देशमुख भागवतराव गागरे या जिल्ह्यातील मान्यवरांनी जलसंधारना संदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या विविध कामांचे अनुभव मांडले.

ना.सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्याकी, एकीकडे महापूर तर, दुसरीकडे दुष्काळ.एकाच जिल्ह्यात भिन्न परिस्थिती असे चित्र का निर्माण झाले याचा विचार आता सर्वानीच करण्याची गरज असून,नवीन पाणी निर्मिती साठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत आवाज उठविला होता याची आठवण करून देताना,पाण्याची उपलब्धता,वापर आणि संधारणा  साठी शासनाचे व्यक्तिगत पातळीवर  अनुदान मिळत असले तरी, हेच काम संस्थांनी केल्यास त्यानाही जलसंधारणाच्या या कामासाठी प्रोस्थाहन म्हणून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त करताना , नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ.  यशवंत थोरात यांनी भविष्यात देशातील मोठा भूभाग कोरडा होण्याची भीती व्यक्त केली असल्याचे त्या म्हणाल्या, डॉ. थोरात यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रवरा परिसरातील विविध संस्थांमध्ये पाणी वापर आणि बचतीच्या योजना राबवीत असल्याचे सौ. विखे यांनी सांगितले. पर्यावरण वाचविण्यासाठी सरकारच्या योजनांना प्रत्येकाने हातभार लावण्याची आवशकता असल्याचेही  त्या यावेळी म्हणाल्या.   

प्रवरा फार्मसी लोणी येथेराष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात

लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या  विविध विविध क्रीडास्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला असल्यावही माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

प्रारंभी मेजर ध्यानचंदयांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले, त्या नंतर देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याह स्ते “ फिटइंडियामुवमेंट “ या कार्यक्रमाचे लाईव प्रक्षेपण महाविद्यालयात करण्यात आले तसेच त्या अंतर्गत १०,००० पावले (स्टेप) चालण्याचा उपक्रमव १०० मीटर धावण्याची स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आली.

तसेच हॉकी चेजादुगार मेजरध्यानचंद यांच्या जन्म  दिना निमित्त दर वर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अंतर्गत महाविद्यालयात इंटरक्लास क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या मध्ये महाविद्यालयातील सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्याल्यामध्ये राष्ट्रीय क्रीडादीना निमित्त आयोजित केलेल्या  विविध विविध क्रीडास्पर्धांप्रसंगी प्राचार्या डॉ. प्रिया राव आणि विद्यार्थी.