औषधनिर्माणशास्र महाविद्यालय (महिला), चिंचोली, चा १००% निकाल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत एप्रिल-मे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेत “ लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेचे औषधनिर्माणशास्र महाविद्यालय (महिला), चिंचोली, ता. सिन्नर, जि. नाशिक या महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारुशीला भंगाळे यांनी दिली. यावेळी व्दितीय वर्ष व  तृतीय वर्षाचा निकाल १००% लागलेला आहे. 

          यात व्दितीय वर्ष अभ्यास क्रमातून एकूण ६२ विद्यार्थ्यान पैकी ५० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, प्रथम श्रेणीत १२ विद्यार्थी उतीर्ण झाले व तृतीय वर्ष अभ्यास क्रमातून ६३ विद्यार्थ्यान पैकी ५६ विद्यार्थी विशेष प्रणाली सह प्रथम श्रेणी घेऊन उतीर्ण झाले. यात व्दितीय अभ्यास क्रमातून अनुक्रमाने कु.कोमल काळे  नामदेव एस.जी.पी.ए. ८.१४३, कु. नम्रता कांगणे  सुदाम एस.जी.पी.ए.८.०३६, कु. प्रतिभा शिंदे  संजय एस.जी.पी.ए ८.०००.

 तृतीय वर्ष अभ्यास क्रमातून अनुक्रमे कु. करिष्मा संध्यान्शे   एस.जी.पी.ए.८.०९७, कु. अश्विनी सानप  शिवाजी एस.जी.पी.ए. ८.०३२ , कु. सुजाता आगळे सूर्यभान एस.जी. पी.ए ७.८७१. गुण मिळवून विशेष प्रविण्यासाहित प्रथम व्दितीय, तृतीय क्रमाने उतीर्ण झाले. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय  चिंचोलीच्या विद्यार्थिनीनी घवघवीत यश संपादन करीत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली 

ह्या सर्व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष ना.  श्री.राधाकृष्ण विखे पाटील, महासंचालक डॉ .यशवंत  थोरात, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा ना. .शालिनीताई विखे पाटील,  खासदार डॉ.सुजय विखे, स्कुल डायरेक्टर  सुश्मिता माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री. भारत घोगरे, टेक्निकल डायरेक्टर डॉ.रेड्डी   शिक्षकांनी अभिनंदन केले. 

इंटीग्रेटेड एम. एस्सी-पी. एचडी. साठी हैद्राबाद विद्यापीठाच्या बायॉकेमिस्ट्री व मॉलेक्युलर बायोलॉजी विभागात निवड झालेल्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील कु. विद्या वर्धिनी हिचे मान्यवरांकडून अभिनंदन

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीनी कु. विद्या वर्धिनी हिची हैद्राबाद विद्यापीठाच्या बायॉकेमिस्ट्री व  मॉलेक्युलर बायोलॉजी विभागात इंटीग्रेटेड एम. एस्सी. -पी. एचडी. साठी निवड झाल्याबद्दल नाबार्ड चे माजी चेअरमन आणि संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले.    

हैदराबाद  विद्यापीठामध्ये उच्च पदवी शिक्षणासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेद्वारे ६ जागेसाठी एकूण ६० विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी सहभाग नोंदविला होता यात कु. विद्या वर्धिनी हिची अंतिम सहा मध्ये निवड झाली व त्यासाठी तिला विद्यावेतनही मिळणार आहे.   

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी, अतांत्रिक शिक्षण संचालक डॉ. दिगंबर खर्डे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक डॉ. धनंजय आहेर, कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन :-लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील  अंतिम वर्षातील  कु. विद्या वर्धिनी विद्यार्थीनीची  हैद्राबाद विद्यापीठाच्या बायॉकेमिस्ट्री व  मॉलेक्युलर बायोलॉजी विभागात इंटीग्रेटेड एम. एस्सी. -पी. एचडी. साठी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करताना  नाबार्ड चे माजी चेअरमन आणि संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी,  कृषी शिक्षण संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, प्राचार्य ऋषिकेश औताडे प्राचार्य निलेश दळे आदी…

ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राच्या उदघाटन

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणे  हीच  ज्ञानाची पहिली पायरी आहे.  जो पर्यन्त आपल्याला काय ज्ञान मिळवायचे हे कळत नाही तोपर्यंत ज्ञानाची आदान प्रदान होणार नाही असे सांगताना  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील  बही:शाल शिक्षण मंडळ राबवित असलेले उपक्रम सर्वांच्याच उपयुक्ततेचे ठरतील असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभुषण उपाधीने सन्मानित )प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ यशवंत थोरात यांनी केले.                  

 लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त  विद्यमाने अहमदनगर जिल्ह्याचे बहिःशाल शिक्षण मंडळ, जेष्ठ नागरिक सहायता कक्ष , विद्यापीठाचे वक्ते ,ग्रंथअन्वेषक आणि केंद्रवाह यांचे संयुक्त कृती सत्राच्या उदघाटन प्रसंगी डॉ. थोरात बोलत होते. या प्रसंगी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बहिःशाल शिक्षण मंडळ व जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाचे संचालक डॉ. नवनाथ तुपे, प्राचार्य डॉ. शशिकांत कुचेकर ,डॉ. भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपप्राचार्या डॉ. अनुश्री दुबे यांनी प्रास्ताविक केले.          

या कृतिसत्रासाठी जिल्ह्यातील सर्व वक्ते,ग्रंथ अन्वेषक आणि केंद्रवाह  यांनी या चर्चा सत्रासाठी उपस्थित होते   संचालक डॉ. नवनाथ तुपे हे या दोन दिवस चालणाऱ्या कृतीसत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.शेवटी महिला महाविद्यालयाच्या केंद्रवाह प्रा. अर्चना घोगरे यांनी केले आहे. 

फोटो कॅप्शन :-लोणी येथे गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय व बही:शाल शिक्षण मंडळ ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने वक्ते, ग्रंथ अन्वेषक व केंद्र वाहक संयुक्त कृतीसत्राचे उदघाटन करताना बही:शाल शिक्षण मंडळ , डॉ नवनाथ तुपे,महासंचालक डॉ यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अशोक कोल्हे,प्राचार्य डॉ शशिकांत कुचेकर,उपप्राचार्या अनुश्री दुबे,केंद्रावाह प्रा अर्चना घोगरे 

प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत एप्रिल- मे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्रच्या अंतिम  परीक्षेत  लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयाने  उज्वल निकालाची परंपरा कायम राखत. यशाची कमान  उंचावत  नेली असल्याची माहिती  प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.          

या वर्षी  द्वितीय वर्ष. तृतीय वर्ष व चतुर्थ वर्ष बी. फार्मसी या तीनही वर्षांचा  निकाल१००% लागला आहे, यात द्वितीय वर्ष अभ्यास्क्रमातून एकूण ६२ विध्यार्थ्यांपैकी ५० विध्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, १२ विध्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले , तृतीयवर्ष अभ्यास्क्रमातुन एकूण ६३विध्यार्थ्यांपैकी ५६  विध्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, ७  विध्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले व चतुर्थ  वर्ष अभ्यास्क्रमातुन एकूण ६३विध्यार्थ्यांपैकी६०   विध्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, ३ विध्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले.          

यात द्वितीय वर्ष अभ्यासक्रमातअनुक्रमे कु.श्रद्धा काशिद  ( एस. जी. पी.ए. ८.७८६), कु.स्नेहल राहाते  ( एस. जी. पी.ए. ८.५७१), कु.  रेखा शिंदे ( एस. जी. पी.ए. ८.३२१) व कु. अंजली सोनवणे( एस. जी. पी.ए. ८.३२१), तृतीय वर्ष अभ्यासक्रमातुन अनुक्रमे कु. वैष्णवी वाघ   ( एस. जी. पी.ए. ८.८०६), कु.  कांचन जंगम ( एस. जी. पी.ए. ८.४८४),व कु. चैत्राली काळे  ( एस. जी. पी.ए. ८.३५५) तसेच चतुर्थ वर्ष अभ्यासक्रमातुन अनुक्रमे कु. प्राजक्ता तांबे  ( सी. जी. पी.ए. ८.४१९), कु. प्रभाकर कातकाडे  ( सी. जी. पी.ए. ८.३१४), कु. श्रद्धा मंडलिक  ( सी.जी. पी.ए. ८.२८४) गुण मिळवून विशेष प्रविण्यासहित प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाने उत्तीर्ण झाले.     

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली. या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष  ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्यास परिषदेच्या अध्यक्ष्या  ना. सौ.शालिनीताई विखे पाटील,  खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे महासंचालक   डॉ. यशवंत  थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव श्री . भारत घोगरे, तांत्रिक-शिक्षण संचालक, डॉ. के.टी.व्ही. रेड्डी, यांनी तसेच  सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची आय.सी .आय.सी .आय बँकेमध्ये निवड.

 लोणी येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या अंतर्गत आय.सी .आय.सी .आय बँकेचे कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडले या मध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पाच  विद्यार्थ्यांची सिनियर ऑफिसर या पदावर नोकरी साठी निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली.        

.यामध्ये कु.अमृता आढाव,कु.ऋतुजा बहिरट,कु.  पूजा थोरात,मनीष गोलाईटकर ,योगेश धोंडगे यांची आय.सि.आय.सि.आय बँकेमध्ये सिनियर ऑफिसर म्हणून निवड झाली असून प्लेसमेंट अधिकारी प्रा.शेळके  प्रा.प्रविण गायकर,प्रा.अमोल सावंत,प्रा.स्वप्नील नलगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे ग्रहनिर्माण मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, युवा नेते खा.डॉ.सुजय विखे पाटील, संस्थचे महासंचालक डॉ.यशवंत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक संचालक डॉ.के व्ही टी रेड्डी,अतांत्रिक संचालक डॉ.दिगंबर खर्डे,आस्थापना संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, संस्थचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ.धनंजय आहेर, कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.मधुकर खेतमाळस,प्राचार्य ऋषीकेश औताडे यांनी विशेष अभिनंदन केले.. 

प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा वर्धापन दिन आनंदाचे डोही आनंद तरंगं

 प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा ११ वा  वर्धापनदिन  ६ जुलै २०१९ रोजी मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. स्कूलचे माजी विद्यार्थी तांत्रिक अभियंता शशांक तांबे, चार्टड अकौंटंट अदित्य मानधने, उत्पादन अभियंता अमोल थोरात, आर्किटेक्ट प्रेरणा कटारिया हे प्रमुख पाहुणे लाभले. प्रमुख पाहुण्यांचा यथोचीत सन्मान प्राचार्यांच्या शुभहस्ते पार पडला तसेच दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मिठाई वाटपाने कार्यक्रम गोड झाला.  मुलींसाठी संगित खुर्ची, चेंडूफेक तर मुलांसाठी रस्सीखेच असे उपक्रम राबवले. सदर प्रसंगी स्कूलचे प्राचार्य श्री सुशील शिंदे, उपप्राचार्य हेमांगी कसरेकर, निमसे सर, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळा संप्पन

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि गीता परिवार संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळा संप्पन झाली असून यामध्ये  पहिल्या टप्प्यात संस्थेच्या बेचाळीस माध्यमिक शाळांमधील सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांचा.  अभ्यासासाठी उत्साह वाढून, बुध्यांक आणि गुणांक वाढविण्याच्या उद्देशाने, दैनंदिन योग साधना करून घेण्यासाठी सुमारे नव्वद क्रीडा शिक्षकांना या कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

       गीता परिवाराचे श्री दत्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रवरा महिला शिक्षण संकुलातील गंगुबाई विखे पाटील इनडोअर स्टेडियम मध्ये संपन्न झालेल्या या ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळेचे उदघाट्न.  संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी  प्रवरा महिला शिक्षण संकुलाच्या संचालिका सौ. लिलावती सरोदे, संस्थेचे क्रीडासंचालक प्रा. अफजल पटेल,डॉ. उत्तमराव अनाप,प्रा. राहुल काळे यांचेसह क्रीडा शिक्षक उपस्थित होते.   

       प्रा. दिगंबर खर्डे म्हणाले कि,  संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील  यांची असी संकल्पना होती कि, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिवसभर प्रफुल्लीत राहायचे असेल तर,योग साधना महत्वाची असून  खेळाच्या तासाप्रमाणेच  दैनंदिन परिपाठाच्या वेळेस विद्यार्थ्यांना योगसाधना देण्यात यावी त्या नुसार प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षक आणि एका शिक्षकांना गीता परिवारातील  योगा तज्ज्ञ प्रशिक्षकाद्वारे हे प्रशिक्षण देण्यात आले असून , आता या शिक्षकांकडून संस्थेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन योग् साधनादेण्यात येणार आहे.

       गीतापरिवाराचे श्री दत्ता सर म्हणाले कि, २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग् दिवस साजरा केला जात असला तरी, योग् हि भारतीय कला आहे. डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गीता परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या योग्य साधनेद्वारे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बुध्यांक आणि गुणांक वाढल्याचे सांगताना स्वतः योगाचार्य रामदेवबाबा यांनी येथील  मुलांची योगसाधना बघून समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. 

चौकट :- * प्रशिक्षित ९० योग दूतांद्वारे संस्थेतील माध्यमिक विभागातील सुमारे २३ हजार  विद्यार्थ्यांना त्या त्या शाळेत परिपाठाच्या वेळी  दैनंदिन १५ मिनिटे संगीतावर आधारित योगसाधना.

*  वर्षाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांचा  एकत्रित योग् साधना कार्यक्रम घेऊन चांगली योगसाधना करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार. इच्छुक ग्रामस्थांना हि  सहभागी करून घेण्यात येणार.

फोटो कॅप्शन :-लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि गीता परिवार संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग् सोपान’ व ‘प्रज्ञा संवर्धन कार्यशाळेंच्या उदघाटन प्रसंगी  गीता परिवाराचे श्री दत्ता सर, संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे , सौ. लिलावती सरोदे, सं प्रा. अफजल पटेल,डॉ. उत्तमराव अनाप.

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे मध्ये स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथि निमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना संस्थेचे सदस्य शशिकांत उर्फ आबासाहेब घोलप, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर. एकनाथ सरोदे,विलास वाणी, श्री शेगावकर आदी.

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राज्य स्तरीय मायक्रोअरे तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन – विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करूनघ्यावे – दत्तात्रय पाटील शिरसाठ

विज्ञान जैवतंत्रज्ञान विकासासाठी अभ्यासात आलेले नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसाद करून नवीन नवीन गोष्टी आचरणात आणल्या पाहिजे असे प्रतिपादन नियोजन समितीचे संचालक श्री दत्ता पाटील शिरसाठ यांनी केले.

     लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी व पद्मश्री विखे पाटील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज प्रवरानगर यांच्या डिजाईन इंनोवेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मेकइंटर आणि वेटलॅब चॅम्पियनशिप यांच्या अध्यक्षतेखाली कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे ‘मायक्रोअरे डाटा ऍनालिसीस इन क्रॉप डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेच्या  उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बायोइन्फो रिसर्च फेलो टाटा मेमोरियल सेंटर, नवी मुंबई येथील श्री.जितेश दोशी, कृषी शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रा.ऋषिकेश औताडे,प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,प्रा.श्रद्धा रणपिसे, प्रा.अभिजित दसपुते, प्रा.मनीषा आदिक आदि मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी प्रा.ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले.

         डॉ.मधुकर खेतमाळस यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलतांना बायोइन्फोरमॅटिक (जैवमाहिती तंत्रज्ञान) अभ्यासात होणाऱ्या बदलाची माहिती करून दिली तसेच येणाऱ्या काळात नक्कीच या विषयावर करियर घेण्याची संधी नक्कीच वाढतील असे आवाहन केले. याचर्चासत्रामध्ये  महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातुन विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. त्यांना बायोइन्फो रिसर्च फेलो टाटा मेमोरियल सेंटर,नवी मुंबई येथील श्री.जितेश दोशी यांचे मार्गदर्शन केले.  

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील बायोइन्फो डिपार्टमेंट प्रा.श्रद्धा रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र होत आहे.

सूत्रसंचालक केदार सौरभ, कु.माने राणी यांनी केले तसेच स्वागत गीत कु.मेघना गुरव यांनी सादर केले व शेवटी आभार प्रा.घोरपडे भाऊसाहेब यांनी केले.

फोटो कॅप्शन :- पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या डिजाईन इंनोवेशन सेंटर यांच्या सहकार्याने तसेच मेकइंटर आणि वेटलॅब चॅम्पियनशिप यांच्या सयुक्त विद्यामाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथे ‘मायक्रोअरे डाटा ऍनालिसीस इन क्रॉप डेव्हलपमेंट’ या दोन दिवसीय राज्य स्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी दत्ता पाटील शिरसाठ, श्री.जितेश दोशी, डॉ.मधुकर खेतमाळस, प्राचार्य. प्रा.ऋषिकेश औताडे,प्रा.सिताराम वरखड, प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत,प्रा.श्रद्धा रणपिसे, प्रा.अभिजित दसपुते, प्रा.मनीषा आदिक आदि 

कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये कृषिदिन साजरा

हरितक्रांतीचे प्रणेते असी ओळख असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त प्रवरा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कृषिदिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती. प्राचार्य सौ. अरुणा थोरात यांनी दिली.

लोणी येथील पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील पर्यावरणशास्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक एस. एस गौरखेडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये पर्यावरणाचा समतोल कसा राखावा तसेच पर्यावरण आणि शेती यांचा परस्परांशी असलेला संबंध या विषयी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी उपप्राचार्य एस. व्ही. भांड , प्रा जे.बी. ब्राम्हणे,प्रा. एन एस. लव्हाटे,प्रा. ए. एस. साळवे इतर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.

कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलन

लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कृषी-कवी संमेलनाचे उदघाटन प्रसंगी कवी डॉ. बाबुराव उपाध्ये, पोपटराव पटारे, श्रीमती संगीता फासाटे, कवी भास्कर दादा लगड, यशवंत पुलाटे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयासाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे प्रा. प्रवीण गायकर आदी.

सर्वच बाबतीत अनुकुलता असलेल्या भारत देशाकडे सर्वजगातील लोक आकर्षित होतात. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने भारताला शेतीप्रधान देश म्हटलं जाते, परंतु राजकारण,समाजकारण आणि अध्यात्मामध्येही शेती बद्द्ल प्रेम व्यक्त केलं जात असले तरी, नवीन पिढीचे शेती बाबतचे आकर्षण कमी होत असल्याची खंत प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केली.

लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त कृषी-कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. कार्यक्रमासाठी कृषी विद्यापीठाच्या रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी आणि कवी महाविरसिंग चव्हाण प्रवरा परिसरातील शब्द्धश्नेही शब्दस्नेही चे अध्यक्ष्य कवी भास्कर दादा लगड, ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार प्राप्त कवी यशवंत धोंडिबा पुलाटे, कवी पोपटराव पटारे, कवयत्री आणि सूत्रसंचालिका श्रीमती संगीता फासाटे, सूत्रसंचालिका आणि कवयत्री कु.शिवानी शिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी प्रास्ताविक केले. .मुख्य समारंभापूर्वी माजी मुख्य मंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित `कृषी व औद्योगिक क्रांतीचे प्रणेते` ही 20 मिनिटाची चित्रफित दाखविण्यात आली.कृषी-कवी संमेलनाचे हे दुसरे वर्ष असून या कवीसंमेलनामध्ये सादर करण्यात येणाऱ्या कवितांचे एकत्रित पुस्तक तयार करण्यात येणार आहे.

कवी संमेलनाच्या अनुशंघाने विद्यार्थ्यांसाठी काव्य स्पर्धा आयोजित करण्यात अली होती यामध्ये मुख्यत्वे शेतकरी व कृषी क्षेत्राशी निगडीत कवितांचे सादरीकरण करण्यात आले त्यामध्ये कु. प्रेषिता यंदे, कु. ऋतुजा भालेराव, कु. स्नेहा हराळ, कु. आरती माळवदे, कु. प्रिया गवळी, कु. भावना शिंदे, कु.धनश्री साबळे, कु.ऋतुजा ढोकचौळे, कु.रुपाली ढोकचौळे, कु. दिप्ती शेळके यांनी सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या. या मध्ये प्रथम क्रमांक कु. ऋतुजा भालेराव, द्वितीय क्रमांक कु. प्रेषिता यंदे आणि तृतीय क्रमांक कु. स्नेहा हाराळ. यांना प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वांना पारितोषिके देण्यात आली. जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी हि शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीची मांडणी असलेली आपली कविता सादर केली.

यावेळी रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण गायकर, प्रा. अमोल सावंत, साहित्य सृजन ग्रुपचे अध्यक्ष सौरभ केदारी,प्रशांत बटुळे,,गौतम पाटेकर,कु. भावना शिंदे, कु. स्वामींनी नवले, कु. निकिता म्हस्के आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

औषधाच्या होणार्या गैरवापर विरोधी आंतरराष्ट्रीय दिन

औषधाच्या होणार्या गैरवापर विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानामित्त लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयामध्ये प्रवरा औषध निर्माण शास्र महाविद्यालयाच्या वतीने औषधांचे होणारे गैरवापर, त्यातून होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या डॉ. प्रिया राव यांनी दिली.

या चर्चा सत्रासाठी विद्यालयातील सर्व विध्यार्थी- विध्यार्थिनी तसेच मुख्याधापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते . यावेळी महाविद्यालयाचे मुख्याधापक निवृत्ती येणगे यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा.डॉ. संजय भवर यांनी औषधांचे होणारे गैरवापर, त्यातून होणारे दुष्परिणाम अधोरेखीत करून त्यासंबंधित मार्गदर्शन केले त्यात त्यांनी औषधांचा होणारा गैरवापर कसा टाळावा व मानवी जिवनावर होणारे दुष्परिणाम कसे टाळावे यासंबंधी जनजागृती केली, सदर सत्राचे आभार प्रा. मयूर भोसले यांनी मानले.