‘परिक्षा पे चर्चा’ या उपक्रमात तालुक्‍यातील सर्व शाळांनी सहभाग घेवून विद्यार्थ्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घडविले…

‘परिक्षा पे चर्चा’ या उपक्रमात तालुक्‍यातील सर्व शाळांनी सहभाग घेवून विद्यार्थ्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घडविले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना यशाचा दिलेला कानमंत्र सर्वांच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण ठरला. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रवरा कन्‍या विद्या मंदिर मध्‍ये विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह पदाधिका-यांनी यांच्‍या समवेत या उपक्रमात सहभाग घेतला.

तणावमुक्‍त परिक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सहा वर्षांपासून परिक्षा पे चर्चा उपक्रम सुरु केला आहे. यंदाच्‍या वर्षीही पंतप्रधानांनी देशातील लाखो विद्यार्थ्‍यांशी संवाद साधून आनंदमय वातावरणात परिक्षेला सामोरे जाण्‍याचा कानमंत्र दिला. तालुक्‍यातील सर्वच शाळांमध्‍ये हा उपक्रम मोठ्या उत्‍साहाने संपन्‍न झाला.

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या ४८ शाखांमधून ११ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा हा कार्यक्रम विद्यार्थ्‍यांना पाहाता यावा यासाठी संस्‍थेच्‍या वतीने सुयोग्‍य पध्‍दतीने नियोजन केले गेले होते. प्रवरा कन्‍या विद्या मंदिर येथील कार्यक्रमात महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनीचीही उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परिक्षेला सामोरे जाण्‍यासाठी दिलेल्‍या टिप्‍स विद्यार्थी मंत्रमुग्‍धपणे ऐकत होते. आपल्‍या संभाषणातून प्रधानमंत्र्यांनी केलेल्‍या विनोदावर विद्यार्थी दादही देत होते. सहज आणि सोप्‍या भाषेत त्‍यांनी दिलेला यशाचा मंत्र हा सर्वांसाठीच महत्‍वपूर्ण असल्‍याची प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा कोणताही उपक्रम हा लोकाभिमुख होतो, त्‍याचे रुपांतर चळवळीत होते. परिक्षा पे चर्चा या उपक्रमातून विद्यार्थ्‍यांप्रती असलेली त्‍यांची संवेदनशिलता आणि जागृकताच पाहायला मिळत असल्‍याची भावना त्‍यांनी आधोरेखित केली.

माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, डॉ.भास्‍करराव खर्डे पाटील, माजी सभापती बापूसाहेब आहेर, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक संजय आहेर, दादासाहेब घोगरे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, नंदकुमार दळे, भाजयुमोचे तालुका अध्‍यक्ष सतिष बावके, राहुल घोगरे, विजय मापारी, पंकज गोर्डे यांच्‍यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनीही शिर्डी येथे कन्‍या विद्या मंदिर या शाळेत परिक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे, साईबाबा संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी आधिकारी राहुल जाधव यांच्‍यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

प्रवरेच्या कृषी सलग्ननित महाविद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांची एच डी एफ सी बँकेत नोकरीसाठी निवड…

लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी संलग्ननित महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांची एच डी एफ सी बँकेमध्ये आर्थिक सल्लागार या पदावरती निवड झाली असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी प्रा.भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली.
कॅम्पस मुलाखतीचे आयोजन लोणी येथील पदमश्री डॉ विखे पाटील महाविद्यालयात करण्यात आले होते. या कॅम्पस मुलाखतीमध्ये कृषी सलग्ननित महाविद्यालयातील एकूण ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.त्यापैकी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे १३, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे ९ आणि कृषी महाविद्यालयाचे ६ असे एकूण २८ विद्यार्थ्याची आर्थिक सल्लागार या पदावरती अंतिम निवड झाली आहे. या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे मुख्य प्लेसमेंट अधिकारी प्रा. मनोज परजने, पदमश्री डॉ विखे पाटील महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी अप्पासाहेब शेळके, प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.सुदाम वर्पे आणि प्रा.धीरज कार्ले आदींनी प्रयत्न केले.
विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल, मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी सलग्ननित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे , कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण गोंटे आदींनी अभिनंदन केले आहे.

स्टार्टअप्स साठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य शासन देखिल नवंउद्योगांच्या सोबत…

स्टार्टअप्स साठी केंद्र सरकार प्रमाणेच राज्य शासन देखिल उद्योगांच्या मागे उभे राहील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टीने देशात उद्योगाचे मोठे जाळे निर्माण होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी प्रवरा रिचर्स इनोव्हेशन स्टार्टअप्स आणि सुक्ष्म लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्यावतीने आयोजित स्टार्टअप्स डे निमित्त इनोव्हेटिंग फॉर इंडीया आणि इनोव्हेटिंग फ्रॉम इंडीया अंतर्गत विविध नवं उद्योजकांशी संवाद साधतांना ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे तांञिक अधिकारी डॉ. प्रविण कदम, सेन्टींग फ्रिडम टेक्नालॉजी, पुणेयेथील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माजी विद्यार्थी राहुल हुडेकरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे, इनोव्हेशन कॉसिल्सचे अध्यक्ष डॉ. संजय कुरकुटे, समन्वयक डॉ. सुभाष मगर, आयआयटी मुंबई टिगर्स लॅबचे समन्वयक आर. आर भांबारे आदीसह विभाग प्रमुख आणि उद्योजक उपस्थित होते.
देशात आज स्टार्टअप्सची निर्मिती मोठ्या प्रमाण होत आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पानेला बळकटी देतांना नवोद्योगांनी विविध क्षेत्रात रोजगाराच्या लाखो संधी निर्माण केल्या आहेत. असे ना. विखे पाटील यांनी सांगून ग्रामीण भारत हा लवकरचं उद्योगशील होणार आहे. स्टार्टअप्स च्या माध्यमातून सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना चालना देण्यासाठी शासकीय विविध योजना, विद्यापीठ संशोधन, विविध कंपन्याचे तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून मद्दत ही होत असल्याने राज्यासह ग्रामीण भागात ही नवोद्योगांची संख्या वाढत आहे. असे सांगून प्रवरेच्या या केंद्राचा लाभ घेऊन आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले.
यावेळी डॉ. प्रविण कदम आणि राहुल हुंडेकरी यांनी थेट संवादातून विविध अडचणी आणि यावर उपायोजना सुचविल्या. प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांनी प्रवरा अभियांत्रिकीच्या माध्यमातून सर्वाना नवीन स्टार्टअप्स साठी मार्गदर्शन केले जात आहे. विविध सुविधा त्याना उपलब्ध असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकांत डॉ. संजय कुरकुटे यांनी प्रवरेच्या इनोव्हेशन संशोधन केंद्राचा आढावा घेत सप्टेंबर 2022 पासून ६३ स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे यामध्ये ग्रामीण युवक, प्राध्यापक, उद्योजक यांचा सहभाग महत्वपूर्ण असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवीन शिक्षण पद्धती नुसार अभियांत्रिकाची वाटचाल सुरू झाली आहे. यावेळी स्टार्टअप्स सुरू करणाऱ्या उद्योजकांचा गौरव ना. विखे पाटील यांनी केला.

प्रजासत्ताक संचलनासाठी प्रवरेच्या वैष्णवी मापारी यांची निवड..

गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाची तृतिय वर्ष बीसीए विभागाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी वसंत मापारी हिची मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक संचलनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चमुमध्ये निवड झाली आहे ती १७ जानेवारीपासून सहभागी होणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ अनुश्री खैरे यांनी दिली.
तिच्या या निवडीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रुपाली नवले उपप्राचार्य प्रा . राजश्री तांबे, विभाग प्रमुख प्रा संजय वाणी , डॉ कांचन देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या निवडी बद्दल महसूल मंञी आणि संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.

प्रवरेच्या डाॅ.महेश खर्डे आणि डॉ. अनिल वाबळे यांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी पेटंट..

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र संशोधन केंद्रांतर्गत प्रेरणा धनंजय जाधव यांनी डॉ. महेश खर्डे व डॉ. अनिल वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले “रुटा ग्रेव्होलेन्स एल पासून हर्बल औषधांची निर्मिती आणि विकास” या विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करत असताना हर्बल औषधांची निर्मिती आणि त्यांचा विकास या अनुषंगाने नाविन्यपूर्ण संशोधन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली आहे. आपल्या संशोधनामध्ये प्रेरणा जाधव यांनी “रुटा ग्रेव्होलेन्स एल” या वनस्पतीच्या माध्यमातून हर्बल औषधांची निर्मिती करत असताना या औषधांचा विविध उपचारांसाठी उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीचे संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाच्या अनुषंगाने डॉ. महेश खर्डे आणि डॉ. अनिल वाबळे यांनी पुढे आणखी सखोल व नाविन्यपूर्ण संशोधन करत हर्बल औषधांची निर्मिती व विकास कसा होत जाईल व त्याचा मानवी जीवनासाठी व आरोग्यासाठी कसा उपयोग होईल यासंदर्भात संशोधन केले
या संशोधनावर आधारित पेटंट मिळवण्यासाठी अर्ज सादर केला. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन त्यांना नुकतेच पेटंट मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. नाविन्यपूर्ण संशोधन करून पेटंट मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
त्यांच्या या संशोधकीय कार्याबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे अतिरिक्त सचिव डॉ. शिवानंद हिरेमठ व पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना पोलीस आणि सैन्‍य भरती प्रक्रीयेसाठी असलेले शारिरीक आणि बौध्‍दीक प्रशिक्षण स्‍थानिक पातळीवरच उपलब्‍घ करुन देण्‍यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने १४ प्रशिक्षण केंद्रांची सुरुवात…

राज्‍यात पोलीस भरती प्रक्रीया सुरु झाल्‍यानंतर ग्रामीण भागातील असंख्‍य तरुण तरुणी या भरती प्रक्रीयेसाठी शहरातील प्रशिक्षण केंद्राकडे आकर्षित होवून तिथे आपला प्रवेश घेतात. मात्र या विद्यार्थ्‍यांना राहाण्‍याची सुविधा उपलब होत नाही. आशा पार्श्‍वभूमीवर निर्माण होणारी अडचण दुर करण्‍यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून प्रशिक्षण केंद्राची उभारणी करुन, पोलीस, सैन्‍य भरती प्रक्रीयेतील इच्‍छुक विद्यार्थ्‍यांना संधी उपलब्‍ध करुन दिली आहे.
मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून संस्‍थेची महाविद्यालये असलेल्‍या १४ गावांमध्‍ये ही प्रशिक्षण केंद्र सुरु झाली आहेत. केंद्रामध्‍ये दाखल झालेल्‍या विद्यार्थी, विद्यार्थींनींना रोज सकाळी आणि संध्‍याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत मैदानावर शारिरीक प्रशिक्षण दि‍ले जाते. या मध्‍ये प्रामुख्‍याने धावणे, गोळाफेक, लांब उडी, सुर्य नमस्‍कार, योगासने अशा क्रिडा प्रकारांचा समावेश असून यासाठी संस्‍थेतील क्रीडा शिक्षक विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. बाहेरील मार्गदर्शकांनाही यासाठी नियुक्‍त करण्‍यात आले असून, त्‍यांचेही मार्गदर्शन या विद्यार्थ्‍यांना उपयुक्‍त आणि महत्‍वपूर्ण ठरत आहे.

प्रशिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या वतीने दररोज केळी, अंडी आदि दूध यांचा नाष्‍टा सकाळी मोफत स्‍वरुपात देण्‍यात येतो. दुपारच्‍या वेळी या विद्यार्थ्‍यांना बौध्दिक आणि स्‍पर्धा परिक्षांसाठी उपयुक्‍त असलेले शैक्षणिक मार्गदर्शनाची सुविधाही महाविद्यालयांमधून निर्माण केली आहे. केवळ पोलीस आणि सैन्‍य भरती नाही तर शासनाच्‍या सरळ सेवा भरती प्रक्रीयेत आवश्‍यक असलेल्‍या सर्वच स्‍पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन तज्‍ज्ञ मार्गदर्शकांकडून देण्‍यात येत आहे. डिसेंबर २०२२ पासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने हा उपक्रम सुरु केलेला उपक्रम भविष्‍यातही कायमस्‍वरुपी सुरु ठेवण्‍याचा मानस मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना स्‍थानिक पातळीवरच हे प्रशिक्षण मोफत उपलब्‍ध झाल्‍याने याचा मोठा दिलासा विद्यार्थी, विद्यार्थींनींना मिळाला असून, आत्‍तापर्यंत ६१९ विद्यार्थी या केंद्रामध्‍ये दाखल झाले आहेत.

प्रवरा रूरल कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा रूरल कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याची माहीती प्राचार्या तेजश्री ठाणगावकर यांनी दिली.
दर्जेदार शिक्षण आणि शिक्षणासोबतचं व्यक्तीमत्व विकासावर विविध व्याख्याने, विषयांतील विविध करीअर संधी यामुळे प्रवरेतील विद्यार्थी हे जगाच्या विविध विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत अंतीम परिक्षेत यश संपादन करणारे हितेश दिनेश पाटील यांची कॉव्हेन्टरी युनिव्हर्सिटी यु.के. येथे मास्टर इन प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट,प्रथमेश प्रशांत मोहोळे यांची अल्गोमा युनिव्हर्सिटी कॅनडा येथे मास्टर इन प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट आणि प्रेरणा संदीप भोकनळ यांची अल्गोमा युनिव्हर्सिटी कॅनडा येथे मास्टर इन प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट यासाठी निवड झाली आहे.
त्यांच्या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,संस्थेचे विश्वस्त माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सह सचिव भारत घोगरे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत अंतर्गत विज्ञान, गणित आणि कलाप्रदर्शन…

गणित-विज्ञान हा विषय जीवनासाठी महत्वपूर्ण आहे. हा विषय मुलांच्या कल्पना शक्तीला संधी देणारा आहे. प्रदर्शनामुळे मुलांना हा विषय सोपा होत असून यामुळे विषयाची आवड मुलामध्ये निर्माण होते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत अंतर्गत विज्ञान, गणित आणि कलाप्रदर्शन २०२२ च्या उद्‌घाटन प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालय येथे दोन दिवस हे प्रदर्शन सुरू होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या प्रवरेतील शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्याच्या संशोधन वृत्तीला अधिक चालना देण्यासाठी दरवर्षी होणारे हे प्रदर्शन माहीती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक प्रयोगांची माहीती मिळते. हसत खेळत शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. म्हणूनच शालेय जीवनातून या प्रदर्शनाची गरज आहे. शेतक-याची मुले आज उच्च शिक्षणातून पुढे जात आहेत ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषदेत असतांना विविध उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबविल्याने आज नगर जिल्हा विज्ञान प्रदर्शनात आघाडीवर असल्याचे सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी स्पर्धेच्या युगात प्रवरेचे शैक्षणिक उपक्रम हे विद्यार्थ्यासाठी महत्वपूर्ण ठरत असून यामुळे त्याच्या कला गुणाला मोठी संधी मिळते.
प्रास्ताविकामध्ये संजय देशमुख यांनी प्रदर्शनाचा आढावा घेत यामध्ये प्रवरेच्या १०० शाळामधुन १६२ उपकरणे सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक इलग यांनी तर आभार सुभाष कडू यांनी मानले.

प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.

प्रवरा औद्योगिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक समुह,प्रवरानगर यांच्यावतीने लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या पद्यश्री डाॅ.विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते अमृत महोत्सवी स्वातंञ दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे विश्वस्त माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जि.प.सदस्या रोणीनीताई निघुते,संस्थेचे सर्व संचालक, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सह सचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक सौ.लिलावती सरोदे, प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे यांच्यासह सर्व प्राचार्य विद्यार्थी उपस्थित होते.
प्रवरा शैक्षणिक संकुल आणि प्रवरा उद्योग समुह येथे राज्याचे महसुल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंञाचा अमृत महोत्सव आणि”हर घर तिरंगा..हर मन तिरंगा “या अंतर्गत प्रभात फेरी,पथनाट्य,चिञरथ याबरोबरचं विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक संकुलात स्वातंञ्याचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष सप्ताह सुरु असून यामध्ये शिक्षक,पालक सर्व नागरीकांचा सहभाग घेण्यात येत आहे.
आजच्या स्वातंञदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यानी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्वधर्म समभावांची शिकवण देण्यात आली.मान्यवरांना संस्थेतील एन.सी.सी.,सुरक्षा कर्मचारी यांनी मानवंदना दिली.

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेल विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला.

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेच्या प्रवरानगरच्या प्रवरा पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार घोषित करण्यात आला. हा पुरस्कार बद्दल राज्याचे महसुल,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंञी तसेच लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षन संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्कुलचे अभिनंदन केले आहे.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या १२२ व्‍या जयंतीचे औचित्‍य साधून परंपरेप्रमाणे देण्‍यात येणा-या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलगौरव पुरस्‍कारांचे वितरण राज्‍यपालांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले.

भारतीय संस्‍कृतीचा मुलभूत सिंध्‍दांतच हा त्‍यागाशी जोडला गेला आहे. ही संस्‍कृती सगळ्यांमध्‍ये एकता निर्माण करणारी आहे. येथील साहित्‍य आणि कलासुध्‍दा मानवाला एकत्रित ठेवून मजबुत करण्‍याचे काम करत असल्‍यामुळेच उद्याच्‍या काळात भारत देश बौध्‍दीक, अध्‍यात्मिक, वैज्ञानिक, आर्थिेक क्षेत्रात जगावर राज्‍य करेल असा अशावाद केरळचे राज्‍यपाल आरीफ महोमंद खान यांनी व्‍यक्‍त केला.

आपल्‍या भाषणात राज्‍यपाल आरीफ महोमंद खान म्‍हणाले की, समाजातील साहित्‍यीकांचा आणि कलाकारांचा होणारा सन्‍मान हे समाज जिवंत असल्‍याचे लक्षण असून, जे शेतक-यांशी जोडल्‍या गेलेल्‍या संघटनातून हा सत्‍कार होत असल्‍याने याचे महत्‍व अधिक असल्‍याचा गौरवपूर्ण उल्‍लेख करुन, त्‍यांनी सांगितले की, महाराष्‍ट्राच्‍या भूमिला संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकारांमाचा जसा अध्‍यात्मिक वारसा मिळाला तसाच छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्‍वराज्‍याचीही कल्‍पना मिळाली. या संकल्‍पनेतूनच स्‍वातंत्र्यांच्‍या आंदोलनाची प्रेरणा मिळाली असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन, त्‍यांनी सांगितले की, मी कोण आहे किंवा मी कुठून येतो यापेक्षाही भारतीय संस्‍कृतीचे मुळ शोधले पाहीजे ती खरी आपली चेतना आहे. घरामध्‍ये जशी आपण किमती वस्‍तु जपून ठेवतो तशीही संस्‍कृती मुल्‍य आणि आदर्शांच्‍या आधारावर आपल्‍याला जपावी लागणार आहे. हे आदर्शच उद्या चरितार्थाचा भाग बनणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या १२२ व्‍या जयंतीचे औचित्‍य साधून परंपरेप्रमाणे देण्‍यात येणा-या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य आणि कलगौरव पुरस्‍कारांचे वितरण राज्‍यपालांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले. ९५ व्‍या अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष भारत सासणे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमास बुलढाणा अर्बन बॅकेचे अध्‍यक्ष राजेश्‍यामजी चांडक, पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष जेष्‍ठ साहित्‍यीक डॉ.रावसाहेब कसबे, माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍यासह प्रवरा परिवाराचे सर्व संस्‍थाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्‍यवरांनी सर्व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळास अभिवादन करुन पुष्‍पचक्र अर्पन केले. लोकनेते खा.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळासही पुष्‍पाजंली अर्पन करण्‍यात आली.

यंदाच्‍या वर्षी साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍काराने किशोर बेडकीहाळ, रविंद्र इंगळे-चावरेकर, अभय गुलाबचंद कांता, मंगेश नारायण काळे, के.जी भालेराव, हिरालाल पगडाल यांना साहित्‍य पुरस्‍काराने तर दत्‍ता भगत आणि छबुबाई चव्‍हाण यांना कला गौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. रोख रक्‍कम स्‍मृतीचिन्‍ह असे या पुरसकाराचे स्‍वरुप असून, पुरस्‍काराचे यंदाचे ही ३२ वर्ष आहे.

हजारो वर्षांपुर्वीचा हा संस्‍कृतीचा इतिहासरामायण, महाभारत, कुराण, बायबल या सर्वच ग्रंथामध्‍ये पाहायला मिळतो. याचाच अर्थ ही एक शब्‍दाची ताकद आहे. शब्‍दांच्‍या समुहानेच भावना अभिव्‍यक्‍त होतात. यातूनच मानसीक बळ आणि मानवी भावना अधिक सुदृढ करण्‍याचे काम भाषेच्‍या माध्‍यमातून झाले असल्‍याचे सांगतानाच साहित्‍यातून आदर्श मुल्‍य निर्माण होण्‍याची गरज व्‍यक्‍त करतानाच प्राकृतीक बदलाची निशानी ही साहित्‍य आणि कलेच्‍या माध्‍यमातून दिसते. या कलेचे अमृत साहित्‍यीकांनी आणि कलाकारांनी निर्माण करताना साहित्‍यातून नैतिकतेचा, समानतेचा आणि लोककल्‍याणाचा भाव निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करावा असे आवाहन त्‍यांनी शेवटी केले.

साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष भारत सासणे म्‍हणाले की, समाजाला भाषा किंवा अक्षरज्ञान अवगत झाले असले तरी, समाज एका निरक्षरतेकडे जात आहे का? अशी भिती व्‍यक्‍त करतानाच कला कधी विभक्‍त होत नाही, तिचे कधी विभाजन करता येत नाही. कला आणि साहित्‍यामध्‍ये विस्‍तृत असे समाजजीवन समाविष्ठ असल्‍यामुळे राजकारणात आणि समाजकारणात तिची व्‍यापकता आपल्‍याला पाहायला मिळते. सद्य परिस्थितीत विचारांची गर्दी वाढली असली तरी, केवळ फॉलोअर्स असून चालणार नाही तर विचावंताची आवश्‍यकता असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले.

जीवन गौरव पुरस्‍कार प्राप्‍त किशोर बेडकीहाळ सत्‍काराला उत्‍तर देताना म्‍हणाले की, या मिळालेल्‍या पुरस्‍कारापर्यंत पोहोचण्‍यासाठी अनेकांच्‍या हाताची मदत झाली. हा पुरस्‍कार त्‍यांनी दिवंगत पत्‍नी आणि डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना समर्पित करीत असल्‍याचे सांगताच, पद्मश्रींच्‍या नावाने मिळणारा हा पुरस्‍कार मोठा आहे. कारण पद्मश्रींनी जो विचार दिला तो शोषणमुक्‍त समाज निर्मितीचा होता. समग्र समाज जीवनाच्‍या आर्थिक आणि सांस्‍कृतीक वातावरणातून समाज ताठमानेने उभा राहावा हा सहकार चळवळीचा विचार होता असे त्‍यांनी आपल्‍या मनोगतात सांगितले.

खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्‍वागत आणि प्रास्‍ताविकातून या साहित्‍य पुरस्‍कारांची ३२ वर्षांपासुनची सुरु असलेली परंपरा प्रवरा परिवाराने जोपासली आहे. साहित्‍यीक आणि कलाकारांचा या पुरस्‍काराने सन्‍मान करण्‍याची मिळणारी संधी हा आमचा गौरव असल्‍याचे ते म्‍हणाले. प्रवरा परिवाराच्‍या वतीने सर्व मान्‍यवरांचा सन्‍मान करण्‍यात आला. या कार्यक्रमास जिल्‍ह्यातून विविध संस्‍थाचे पदाधिकारी, साहित्‍यप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

शिक्षणाबरोबरच व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची गरज – भारत सासणे

शिक्षणा सोबतच विवेकी विचार निर्भयता आणि व्यासंगीवृती विद्यार्थ्यानी आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे मत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संम्मेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

 प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूह आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्याच्या  पारितोषिक वितरण कार्यक्रमात भारत सासणे बोलत होते. संस्थेचे सहसचिव  भारत घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास विखे पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक अभिजित भागडे, कार्यालय अधिक्षक मधुकर चौधरी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे,प्रा. नंदु दळे, डॉ. अण्णासाहेब तांबे आदी उपस्थित होते. 

आपल्या मार्गदर्शनात भारत सासणे म्हणाले आजची तरुण पिढी ही स्वप्न बघणारी आणि स्वनपुर्ती करण्यासाठी कायम सक्षम असलेली पिढी आहे. विद्यार्थीनी कला, संस्कृती, वाचन चिंतन करतांना त्यावर विचारमंथन केले पाहीजे आभासी, चांगुळ पणा, उत्तम विचार, आनंदी जीवन यांचा समतोल  आयुष्यासाठी गरजेचा आहे.मूल्यव्यवस्था आणि व्यक्तीमत्व आणि आव्हाने मोठी असली तरी यातील संधी शोधण्याची गरज आहे. सत्यचा आवाज हा कायम ठेवतांना  निर्भयता, विवेकी विचार, व्यासंगवृत्ती जीवनाचा पाया असल्याचे  सासणे यांनी सांगून विद्यार्थी हा साधक असला पाहीजे. शालेय ज्ञानाबरोबरचे ग्रंथ संपदा वाचन यांतून आपली आपले ध्येय साथ करतांना सर्व साहित्याचे वाचन करावे जगात पोहण्यासाठी आणि जागतिकरणाच

भूत डोक्यात न ठेवता त्यास आव्हान न मानता ज्ञानाची साधना, नवीन रस्ते आणि उपलब्ध ज्ञान यातून आपण कसे प्रबळ होत राहू याचे प्रयत्न प्रवरा शैक्षणिक संस्थेतून होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.