आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा संघ यंदाचा फिरत्या चषकाचा मानकरी

वक्तृत्व विषयातील महत्त्वाच्या स्पर्धेपैकी महाराष्ट्रात प्रसिध्द आणि मानाची समजली जाणाऱ्या  ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद  ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा”  मध्ये “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! या विषयावर चौकस आणि अभ्यासपुर्ण मत मांडणाऱ्या पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा संघ यंदाचा फिरत्या चषकाचा मानकरी ठरला.

‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्ध्येच्या ३९ व्या  वर्षी “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! असा विषय ठेवण्यात आला होता. अहमदनगर,धुळे ,नाशिक औरंगाबाद, पुणे सह राज्यभरातील सुमारे ३० वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातून ६० स्पर्धक सहभागी झाले होते यात ३७ मुलींनी उल्लेखनीय असा सहभाग नोंदविला. नाशिक येथील नासा-स्पेस च्या अभियंत्या सौ. अपुर्वा जाखडी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सौ. शालिनीताई विखे पाटील , प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे  सदस्य आणि सचिव श्री भारत घोगरे, परीक्षक आर.बी.एन बी महाविद्यालयातील डॉ. उज्वला भोर,शेवगाव येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रा. ओंकार रसाळ,संगमनेर महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राचे समन्वयक व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक लिंबेकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दीघे प्रा. दत्तात्रय थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपप्राचार्य डॉ. रामचंद्र रसाळ यांनी प्रास्ताविक केले.

पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील निखिल बेलोटे आणि कु.आश्विनी टावरे यांच्या संघाला  फिरता पद्मश्री विखे पाटील करंडक आणि २१००/-चे पारितोषिक देण्यात आले तर, तसेच गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या वरिष्ट गटातील पहिल्या चार क्रमांकाच्या निखिल बेलोटे आणि कु.आश्विनी टावरे स्पर्धकांना  ७,१०१/-रू पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक, द्वितीय क्रमांकांचे ५१०१/-रू,चे  पारितोषिक पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील सुमित मेहेत्रे आणि तृतीय क्रमांकाचे आणि ३,१०१/-रू चे पारितोषिक पुणे जिल्ह्यातील वारजे येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सुमित काळगे या स्पर्धकाला राजे, उतेजनार्थ  १५००/- चे पारितोषिक लोणी येथील कृषी महाविद्यालयातील ऋषिकेश चोळके या स्पर्धकांनी मिळविले.

कनिष्ठ महाविद्यालय गटातील संगमनेर येथील विशाल कानवडे याला प्रथम क्रमांकाचे २,५०१/-रू, प्रवरा कन्या विद्यामंदिरची कु. हृतिक वाघ या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांकाचे ,२,१०१/-रू चे पारितोषिक आणि प्रवरा पब्लिक स्कुलच्या कु. करुणा जगताप  तृतीय क्रमांकाचे १,५०१/-रू चे पारितोषिक तर उत्तेजनार्थ ७०१/-रुपयांचे पारितोषिक पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील कु. आकांशा पवार या स्पर्धकांनी मिळविले. गुणानुक्रमे पहिल्या दहा संघांना प्रवास खर्च, सर्व स्पर्धकांना मोफत भोजन आणि निवास व्यवस्था आणि विजेत्या स्पर्धकांना स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

अपुर्वा जाखडी यांनी आजच्या काळात मुलं-मुलींमध्ये फारसा भेदभाव केला जात नसला तरी मिळालेल्या संधीचा योग्य वापर करून समाजासाठी काम करू शकतो  असे सांगताना प्रवरेच्या महाविद्यालयांमधून विदयार्थी विकसित होणारे विविध कार्यक्रम राबविले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर, सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांनी माध्यमांचा वापर केवळ माहिती मिळविण्यासाठीच करावा तसेच वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तू मध्ये पुस्तकाचा समावेश असावा असी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी आभार व्यक्त केले.
संयोजन समितीचे प्रा.उत्तम येवले,प्रा. डॉ राजेंद्र सलालकर,प्रा.अनिल गाढवे, डॉ, वैशाली  मुरादे,डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

फोटो कॅप्शन:- लोणी येथे प विखे पाटील कला,विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन रौप्य करंडक वाद विवाद स्पेर्धेमध्ये यंदाचा मानकरी ठरलेल्या  पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या संघातील निखिल बेलोटे आणि कु.आश्विनी टावरे या स्पर्धकांना  फिरता चषक आणि ७,१०१/-रू पारितोषिक प्रदान करताना नासा-स्पेस च्या अभियंत्या सौ. अपुर्वा जाखडी, सौ.  शालिनीताई विखे पाटील , सचिव भारत घोगरे,,प्राचार्य डॉ प्रदीप दिघे, उपप्राचार्य प्रा डी जी थोरात,प्रा सी एस गलांडे,कार्याध्यक्ष डॉ शांताराम चौधरी.

जी व्ही के बायो सायन्स कंपनीने पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये १५ विद्यार्थ्यांची तीन लाख रुपये असे आकर्षक पैकेज देऊन नोकरीसाठी निवड.

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये बेंगलोरस्थित जी व्ही के बायो सायन्स प्राव्हेट लिमिटेड, हैदराबाद या बहुराष्ट्रीय कंपनीने महाविद्यालयातील एम एस सी केमिस्ट्री विभागातील १५ विद्यार्थ्यांची तीन लाख रुपये असे आकर्षक पैकेज देऊन नोकरीसाठी निवड केली  असल्याची माहिती संस्थेचे प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर यांनी दिली.

जी व्ही के बायो सायन्स कंपनीने पद्मश्री विखे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये सुमारे १६६ सहभाग घेतला या पैकी १५ विद्यार्थ्यांची तीन लाख रुपये असे आकर्षक पैकेज देऊन नोकरीसाठी निवड केली आहे. या वेळी  जी व्ही के बायो सायन्स कंपनीचे वरिष्ठ संचालक डॉ.अनिल पाल, सहा संचालक डॉ प्रादीपत सिन्हा, एच आर मॅनेजर पुजा धिल्लोन, उपसंचालक आदित्य दोन्नती आदी उपस्थित होते.

माजी मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटीलयांच्या संकल्पनेतून आणि नाबार्डचे माजी चेअरमन व संस्थेचे महासंचालक  डॉ. यशवंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट विभागातर्फे सातत्याने विविध महाविद्यालयांमध्ये परिसर मुलाखतींचे आयोजन केले जात असून त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी होत आहे.

निवड झालेल्या  विद्यार्थ्यांचे  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सौ. शालिनीताई  विखे पाटील, संस्थेचे महासंचालक डॉ. यशवंत थोरात, सहसचिव श्री. भारत घोगरे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. के. टी. व्ही रेड्डी,डॉ. हरिभाऊ आहेर,आस्थापना  संचालक प्रा. दिगंबर खर्डे, प्राचार्य डॉ प्रदीप दिघे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

फोटोकॅप्शन :- पदमश्री विखे पाटील कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये जी व्ही के बायो सायन्स प्राव्हेट लिमिटेड, हैदराबाद या बहुराष्ट्रीय कंपनीने आयोजित केलेल्या परिसर मुलाखतीद्वारे १५ विद्यार्थ्यांची नोकरी साठी  निवड झाल्याने  त्यांचा गौरव करताना प्लेसमेन्ट विभागाचे संचालक प्रा. धनंजय आहेर ,प्राचार्य डॉ प्रदीप दिघे ,प्रा दत्तात्रय थोरात आणि शिक्षक

सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्ध्येचा उदघाट्न संपन्न

विविध स्पर्धांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने युवावर्गाचे व्यक्तिमत्व घडत असतानाही आज ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेण्याचा कल  वाढत आहे, तर, समाज मनावर परिणाम करणाऱ्या माध्यमांचा युगातही  विविध चॅनेल्स द्वारे अनावश्यक विषयांवरच चर्चा होताना दिसत आहे.परंतु, खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक घडविण्याचे काम हे महाविद्यालयीन शिक्षणचं करू शकत असल्याने, आता.  महाविद्यालयांनीही युवकांना काय अपेक्षित आहे. हे समजून घेऊन सार्वजनिक जीवनात आत्मविश्वासाने  सामोरे जाऊ शकतील असे शिक्षण युवा पिढीला दयावे लागेल  असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्ध्येच्या उदघाट्न प्रसंगी आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते या प्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणून नाशिक येथील सौ प्रसिद्ध कवियत्री सौ. सुरेखा बोऱ्हाडे,जेष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सदस्य आणि सचिव भारत घोगरे,शिक्षणधकिकारी प्रा. दिगंबर खर्डे, डॉ. राजेंद्र सलालकर “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! असा विषय असलेल्या या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण करणारे डॉ. उज्वला भोर, डॉ. अशोक लिंबेकर,प्रा. ओंकार रसाळ आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी प्रास्ताविक केले तर,सातत्याने ३९ वर्ष, देश आणि जागतिकस्तरावरील एका ज्वलंत विषयावर या वादविवाद स्पर्धेमधे तरुणाईच्या विचारमंथनातून वक्तृत्व-वादकौशल्य घडवुन आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्पर्धेचे  कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी सांगितले.

आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि, कालांतराने स्पर्धा या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. कितीही बदल झाले तरी, आदर्श नागरिक घडविण्याचे काम हे महाविद्यालयीन स्तरावरच होणार असल्याने होणाऱ्या स्पर्धा किंवा कार्यक्रम हे आपल्यासाठी होत असल्याचा विश्वास युवावर्गाला देण्यासाठी आता महाविद्यालयांनीच  पुढाकार घेऊन युवकांच्या अपेक्षा विचारात घेऊन स्पर्धांची आखणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जेष्ठ पत्रकार बाळ बोठे यांनी मुलांपेक्षा मुली सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर असल्याचे सांगताना भविष्यात वर पसंतीहि मुलीच करतील या विनोदावर आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरेतील मुले आणि मुली हे सर्वच बाबतीत आणि क्षेत्रात आघाडीवर असल्याने मुला-मुलींमध्ये तुलना करणे चुकीचे ठरेल असे सांगितले.

 “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! या विषयाचा धागा पकडून  बाळ ज. बोठे म्हणाले कि, आजची स्त्री ही जोखडातून मुक्त होऊन लढाऊ वैमाणिक होण्यापर्यंत आजच्या स्त्रीयांनी मजल मारली आहे. अत्याचार हे पूर्वी पासूनच होत असले तरी, आज माध्यमांमुळे जागरुकता वाढली आहे. सोशल मीडियामध्ये तरुण गुंतत चालला मात्र मुली मौलांच्या पुढे जाताना  दिसतात भविष्यात तर मुली इतक्या पुध्ये जातील कि, वर परिक्षा या मुलीच घेतील कि, काय असी परिस्थिती निर्माण झाली तर,आश्चर्य वाटण्याचे कारण नाही .असे ते म्हणाले.

सौ. सुरेखा बोऱ्हाडे,मध्यमयुगा पासून १८३० ते १९१५ या कालखंडामध्ये स्रियांच्या उन्नतीच्या दिशेने काम झाले असले आणि स्वातन्त्रतोत्तर काळात राज्यघटनेद्वारे स्त्रीयाच्या सौरक्षणासाठी नियम आणि कायदे होत असले तरी, दुर्दैवाने आजही बलात्कारासारख्या घटना घडत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. प्रा. छाया गलांडे यांनी आभार तर, प्रा. संगीत धिमते आणि डॉ. वैशाली मुरादे यांनी सूत्रसंचालन केले.

“२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे!” या प्रस्तावावर यंदाच्या ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धा

राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या  वक्तृत्व विषयातील एका महत्त्वाच्या स्पर्धेपैकी महाराष्ट्रात प्रसिध्द आणि मानाची समजली जाणारी ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा” ७ आणि ८ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आली असून लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये होणाऱ्या या’रौप्य करंडक वादविवाद स्पर्धे’साठी “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “! असा विषय ठेवण्यात आला असल्याची माहिती कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी दिली.

स्पर्धेचे उद्घाटन दि. ७ जानेवारी रोजी नाशिक येथील सौ सुरेखा बोऱ्हाडे यांच्या हस्ते होणार असून , या वेळी आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर ८ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या समारोप समारंभासाठी नाशिक येथील अपूर्वा जाखडी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जगामध्ये वादाची परंपरा फार फार जुनी तरी, आशा स्पर्धे मध्ये तिथे हार-जीत नसते.वक्तृत्वकलेची सर्वात खरी कसोटी वाद स्पर्धेमध्ये लागते. कारण वक्तृत्वाबरोबरच इथे विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू कशी वरचढ आणि बरोबर आहे हे दिलेल्या वेळामध्ये परीक्षकांना आणि श्रोत्यांना पटवून द्यायचे असते.एका ज्वलंत विषयावर या वादविवाद स्पर्धेमधे तरुणाईच्या विचारमंथनातून वक्तृत्व-वादकौशल्य घडवुन आणण्याचे हे ३९ वे. वर्ष आहे.

या वादविवाद स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सोमवार दि ६ जानेवारी २०२० असून,या स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्यासंघास फिरता पद्मश्री विखे पाटील करंडक आणि २१००/-चे पारितोषिक देण्यात येईल.तसेच गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या वरिष्ट गटातील पहिल्या चार क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे ७,१०१/-रू, ५१०१/-रू,आणि ३,१०१/-रू व उत्तेजनार्थ १५००/- रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालय गटातील गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या पहिल्या चार क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे २,५०१/-रू,२,१०१/-रू,आणि १,५०१/-रू व उत्तेजनार्थ ७०१/- अशी पारितोषिके देण्यात येतील. गुणानुक्रमे पहिल्या दहा संघांना एक्का बाजुचा प्रवास खर्च, सर्व स्पर्धकांना मोफत भोजन आणि निवास व्यवस्था आणि विजेत्या स्पर्धकांना स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. ७ जानेवारी २०२० रोजी संद्याकाळी ५;३० नंतर महाविद्यालयाच्या बस ने मोफत शिर्डी येथे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. ८ जानेवारी २०२० रोजी आयोजित केला असून राज्यातील महाविद्यालयांमधून दोन्ही गटासाठी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, संयोजन समितीचे प्रा.यु ओ येवले,प्रा. डॉ राजेंद्र सलालकर,प्रा.ए.जी गाढवे, डॉ, व्ही. डी मुरादे,डॉ. बी.डी रणपिसे यांनी केले आहे.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जोतीरावांच्या पश्चात सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाईं फुले यांनी  शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल ही आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होती. असे प्रतिपादन संस्थेचे सदस्य आणि सचिव भारत घोगरे यांनी केले.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यकर्तमात  श्री घोगरे बोलत होते. प्रवरा एव्हीएशनच्या संचालिका सुश्मिता विखे पाटील, शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,सौ. लीलावती सरोदे , विलास वाणी,शामराव गायकवाड, आत्माराम मुठे,योगेश शेपाळ आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

श्री भारत घोगरे,म्हणाले कि, समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता येताना सनातनी गुंड  त्रास देत.  कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.पण त्यांनी शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले,. जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्याचे ते म्हणाले.


फोटो कॅप्शन :-  लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील(पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यकर्तमात  श्री घोगरे बोलत होते. प्रवरा एव्हीएशनच्या संचालिका सुश्मिता विखे पाटील,  शिक्षण संचालक प्रा. दिगंबर खर्डे, एकनाथ सरोदे, बापूसाहेब अनाप,विलास वाणी,शामराव गायकवाड, आत्माराम मुठे,योगेश शेपाळ आदी

प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या सात केंद्राद्वारें मराठी,इंग्रजी आणि सेमी ,इंग्रजी माध्यमाच्या एकुण ४१ शाळेतील सुमारे १ हजार ९२ विद्यार्थ्यांनी दिली प्रज्ञा शोध परीक्षा

स्पर्ध्येच्या युगात शालेय शिक्षण संपवून उच्यशिक्षणाच्या विविध संधीसाठी लागणाऱ्या पूर्व परीक्षेच्या तयारी मार्गदर्शनासाठी  प्रवरानगर येथे स्थापन  केलेल्या “प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विशेष नैपुण्य मिळवले असल्याची माहिती प्रवरा सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा. शहाजी साखरे यांनी दिली.  मराठी,इंग्रजी आणि सेमी ,इंग्रजी माध्यमाच्या एकुण ४१ शाळेतील सुमारे १  हजार ९२ विद्यार्थ्यां सात केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी बसले होते.

ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्म भुषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थ्ये मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवं-नविन संकल्पना राबविण्यात येत असतात . संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आ. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि कल्पक मार्गदर्शनाखाली आधुनिक उपक्रम  राबवुन या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ऊत्तमोत्तम मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जाते.

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रवेश पुर्व परिक्षेत उत्तम यश संपादन केल्याशिवाय, १२ वी विज्ञान परीक्षेनंतरच्या ऊच्च शिक्षणासाठी चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळत नाही. इंजिनिअरींग, ऍग्रीकल्चर,  फार्मसी, मेडिकल,आर्किटेक्चर  ईत्यादी अभ्यासक्रमास  प्रवेश घेण्यासाठी एमएचसीसीइटी ,नीट ,आयआयटी,जेईई  सारख्या परिक्षेत चांगले यश संपादन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी  लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्म भुषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थ्ये गेल्या वर्षी पासून ” प्रवरा सायन्स अकॅडेमी”ची स्थापना केली आहे. आज या अकॅडेमी मध्ये  अकरावी  आणि बारावी विज्ञान शाखेचे एकुण ३४४ विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत.पूर्व परिक्षेचे यश हे प्रामुख्याने  विद्यार्थ्यांच्या गणित व  विज्ञान  या विषयाच्या नैपुण्यावर  अवलंबून असते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाच्यावेळीच गणित विज्ञान या विषयात आवड निर्माण व्हावी, यासाठी सुरवातीला प्रायोगितक तत्वावर अकॅडेमीने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या पाच शाळेतआठवी  ,नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स सुरु केला आहे.आज या अकॅडेमी मध्ये  एकुण ४२६  विद्यार्थी  फाउंडेशन कोर्स द्वारे मार्गदर्शन घेत आहेत.

प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये  इयत्ता आठवी मधील वैभव धारपळे,कु.स्नेहा बडे,ओंकार मेहर,प्रबोध तांबे,सार्थक निमसे,वैभव गायकर,कु.समृद्धी खांडरे तर, इयत्ता नववीच्या अथर्व चौधरी,सोमेश हुलजुटे, अरविंद इथापे,कु. सायली गागरे आणि इयत्ता दहावी मधील कु. अक्षदा जाधव, कु. अनुराधा मुळे, युवराज पवार, हर्षवर्धन होन या विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळविले. 

या विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय  विखे पाटील, महासंचालक डॉ यशवंत थोरात, प्रा. दिगंबर खर्डे, आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

फोटो कॅप्शन:- प्रवरा सायन्स अकॅडमी’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी  सात केंद्रावर  परीक्षा देणारे विद्यार्थी. 

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कमवा व शिका विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

आर्थिक परिस्थिती खडतर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करतानाच सुरु केलेल्या “कमवा आणि शिका’ योजने द्वारे शिक्षण घेता येईल अशी कल्पना नसलेले हजारो युवक-युवती “कमवा आणि शिका ” योजनेतून शिक्षण घेऊन देश आणि जागतिक पातळीवर स्थावरझाले असून नुकत्याच पार पडलेल्या स्वयंसिद्धा यात्रेत लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री करून अर्थार्जन केल्याने विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याची माहिती कृषी  शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस यांनी दिली.

उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबातील होतकरू मूले-मुलींना शिक्षण मिळाले पाटहजे या साठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी  यासाठी या योजनेचा आणखी विस्तार करून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये ” कमवा आणि शिका “ही योजना आणखी प्रभावी पणे स्वबळावर सुरू केली.संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातही हि योजना   सन २००३ पासून कार्यान्वित आहे.  आज पर्यंत अनेकांनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण केल्या नंतर  मोठ्या पदावर काम करण्याची मजल मारली आहे.

त्याच अनुषंगाने पंचायत समिती राहता आणि जनसेवा फाऊंडेशन लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी येथे पाच दिवसीय स्वयंसिद्ध यात्राचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध बचतगट, महाविद्यालयाच्या कमवा आणि शिका मधील विद्यार्थ्यांनी स्टॉल लावून आपल्या उत्पादनाचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदी फुले व बुके बनवून त्याची विक्री केली तसेच महाविद्यालयातील शेती विभागाद्वारे उत्पादित पेरू, ढोबळी मिरची व पेरू रोपे यांची माहिती व विक्री केली.

विद्यार्थ्यांनी यावेळी मान्यवरांना माहिती पटवून दिली यामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जि. परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील व कार्यकारी सहाय्यक सुश्मिता माने यांनी विद्यार्थ्यांचा स्टॉल बघून कौतुक केले. कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्यांनी बनवलेले कागदी  बुके घेऊन इतर संस्थांना वापरण्याचे आव्हान करून प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कृषी संलग्नित महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.मधुकर खेतमाळस, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी अभिनंदन केले व या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना फार्म विभाग प्रमुख श्री.सुनील कानडे, प्रशांत आहेर तसेच कमवा आणि शिका समन्वयक प्रा. मनीषा आदिक यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो कॅप्शन :- कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातीळल ‘कमवा आणि शिका’योजनेतील  विद्यार्थ्यांनी वस्तु विक्रीतून केलेल्या कमाई या  उपक्रमाचे कौतुककरताना ना.सौ शालिनीताई विखे , सरपंच सौ. मनीषा आहेर, सौ. रुपाली लोंढे आणि मान्यवर

अंतरविद्यापीठ युवा महोत्सवात प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाचे यश

लोकनेतेडॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील विध्यार्थिनी कु. तृप्ती राजेश पंडित हिने गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात नुकताच पार पडलेल्या राज्य स्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव “इंद्रधनुष्य” मध्येमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी दिली.

सदर स्पर्धा दिनांक ०२ डिसेंबर ते ०६ डिसेंबर दरम्यान पार पडल्या होत्या.या युवा महोत्सवातमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघालावकृत्व स्पर्धा,सांस्कृतिक मिरवणूक, पथनाट्य इ. मध्ये अनुक्रमेप्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. या सर्व स्पर्थामध्ये कु.तृप्ती राजेश पंडित हिने उल्लेखनीय सहभाग घेतला होता.तिला या यशामध्ये म.फु.कृ.वि.,राहुरीचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण व महाविद्यालाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वाल्मिक जंजाळ आदींचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल  संथेचेअध्यक्षआ.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, जि. प. अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील , संस्थेचे महासंचालक डॉ. वाय.एस.पी. थोरात , सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील , कृषि शिक्षणसंचालक डॉ.मधुकर खेतमाळस आदींनी अभिनंदन केले.

पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण इन्स्टिट्यूटच्या (एस.पी.आय.) च्या २२ व्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

धड्पडकरून कोषातून बाहेर पडनारा पतंग जीवनातील प्रयत्नांद्वारेच प्रत्येक गोष्ट शिकत पुढे जातो. त्याच प्रमाणे ध्येय प्राप्ती अशक्य कधीच नसते त्यासाठी जीद्द,चिकाटी, आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ज्याला शक्य होईल तो जीवनात यशस्वी होतॊच असे प्रतिपादन पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थे (एस.पी.आय.) चे माजी विद्यार्थी आणि सध्या गोरखा रेजिमेंटचे प्रमुख मेजर निखिल निकम यांनी केले.

लोणी पद्मश्री विखे पाटील सैनिकी स्कुल आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण इन्स्टिट्यूटच्या (एस.पी.आय.) च्या २२ व्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात मेजर निखिल निकम बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी लोणी खुर्दच्या सरपंच सौ. मनीषा आहेर,प्रवरा ग्रामीन शिक्षण संस्थेचे सदस्य ज्ञानदेव म्हस्के,आप्पासाहेब दिघे, सदस्य व सचिव श्री भारत घोगरे, शिक्षणाधिकारी प्रा. विजय आहेर, कन्या कॅम्पसच्या संचालक सौ. लीलावती सरोदे,गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कुलच्या प्राचार्या सौ संगिता देवकर, प्रवरा पब्लिक स्कुलचे प्राचार्य सयाराम शेळके, प्रवरा हाईसस्कुलचे प्राचार्य श्री निर्मळ ,विलास शेळके,सौ. ज्योती कौशिक तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एन डी  ए) परीक्षेची तयारी करणारे  माजी विदयार्थी श्री आदित्य कासार,रौमिक चोखंडे,राज करणोरे आणि सत्यम सानप आदी मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी शाळेचे कमांडण्ट कर्नल डॉ. भरतकुमार यांनी स्वागत तर, प्राचार्य सुधीर मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला.

भारत गाढवे, रमेश दळे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक आणि क्रीडा पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक पारितोषिकांमध्ये  सिद्धांत शेळके,तन्मय पवार,सुशील पुरी,महेश ढाकळे,आणि क्रीडा पारितोषिकांमध्ये मृणाल तारडे ,यश कुताल,निरंजन गांगर्डे,गौरव माधावी तर ,सर्वसमावेशक सिध्दांत शेळके,जयगलांडे,तेजस पारखे,महेश ससाणे यांचा समावेश होता . यावर्षीची चॅम्पियन ट्रॉफी वैद्दय हाऊस ने प्राप्त केली. या वेळी जबाबदारी पेक्षा सरस कामगिरी केलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचाही सन्मान करण्यात आला. या मध्ये भारत गाढवे,इसाक पठाण,रमेश दळे,अकिल शेख,आर एम मोरे,बी. ए कुलांगे,प्रमोद देशमुख,विनय धालयांत,शहाजी मगर,दीपक ढोणे, संतोष कांबळे,विनोद शिरसाठ,अण्णासाहेब पगारे, संदीप पडघलमल,गणेश काळे, सौ. सविता दिवे,सौ सुनिता खोडे यांना सन्मानित करण्यात आले.

तर, प्रा. राजेश माघाडे आणि सुनील ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर, भारत हमको जनसे भीप्यारा है. हि थीम असलेला सांकृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांची उपस्थीतीउल्लेखनीय होती शेवटी इसाक पठाण यांनी आभार व्यक्त केले.

लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात दि. १३ डिसेंबर ते १६  डिसेंबर या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या क्रिकेट या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या १०  जिल्यातील  ३०  संघानी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे  उदघाटन १३ डिसेंबर २०१९  रोजी महाविद्यालयाती प्रांगणात झाले असून या उदघाटन प्रसंगी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीर सिंग चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील हे उपस्थित होते. डॉ. महावीरसिंग चौहान यांनी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाचे महत्व समजून सांगितले तसेच कार्क्रमाचे अध्यक्ष भारत घोगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना उदघाटनप्रसंगी  मार्गदर्शन केले.

यावेळी कृषी महाविद्यालय विळद घाट येथील प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. मधुकर खेतमाळस (संचालक कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय), प्रा. निलेश दळे (प्राचार्य कृषी महाविद्यालय), प्रा. रोहित उंबरकर (प्राचार्य कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय), प्रा. ऋषिकेश औताडे ( प्राचार्य कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय), डॉ. खर्डे (उपप्राचार्य पी व्ही पी जुनिअर कॉलेज ) व इतर शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बाभळेश्वर येथे सोमवार पासून राहता तालुका विज्ञान व गणित प्रदर्शन

राहता तालुका पंचायत समिती आणि तालुका गणित – विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विदयमाने बाभळेश्वर येथील पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सोमवार दि. १६ ते बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९ दरम्यान राहता तालुका विज्ञान व गणित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या. विज्ञान व गणित प्रदर्शनाच उदघाटन सोहळा  सोमवार दि. १६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १२ वा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सभापती सौ. हिराबाई कातोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या  प्रदर्शना साठीजिल्हा परिषद सदस्या सौ.पुष्पाताई रोहम,सौ. कविता लहारे,श्री शाम माळी,श्री दिनेश बर्डे,पंचायत समिती सदस्या  सौ. सुवर्णा तेलोरे, सौ. अर्चना आहेर, सौ. नंदाताई तांबे,श्रीमती शोभा जेजुरकर,श्री ओमेश जपे ,श्री काळू राजपूत, संतोष ब्राम्हणे, भारत अंत्रे , तुकाराम बेंद्रे, ज्ञानदेव आहेर, अण्णासाहेब बेंद्रे ,श्रीपाद मोकाशी सरपंच उपसरपंच आणि सद्स्य उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनांध्ये उत्कृष्ठ ठरलेल्या प्रयोगांना पारितोषिक देऊन गौवरविण्यात येणार असून  बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी २ वा. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आणि उपसभापती बाबासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या प्रदर्शनासाठी तालुक्यातील विद्यार्थी आणि पालकांनी उपपिस्थत राहावे असे आवाहन गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे,गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री दिपक डेंगळे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर वाघचौरे,श्रीमती शबाना शेख ,श्री धोंडीराम राऊत,विज्ञान संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकर साळुंके ,गणित संघटनेचे अध्यक्ष श्री शंकर रिंगे , बाभळेश्वरचे केंद्र प्रमुख श्री सुनील सिनारे यांचे सह तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख,प. स  राहता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि मुख्याध्यापकांनी केले आहे.

प्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव जलौषात संपन्न

प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव जलौषात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य प्राचार्य सयराम  शेळके यांनी दिली. या क्रीडा महोत्सवा मध्ये मनाचा समाजाला जाणारा प्रथम क्रमांकाचा मान  नेताजी सदनाने मिळविला.

प्रवरा पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी आणि माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री अरुण वाबळे यांच्या हस्ते या क्रीडा  महोत्सवामध्ये विजयी झालेले संघ आणि खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.या प्रसंगी प्रवरा पब्लिक स्कूलचे संचालक कर्नल डॉ. के. जगन्नाथन,उपप्राचार्य  किसनराव   अडसूळ, , श्री मिनास जोसेफ,सौ. मीना जगधने,प्राथमिक विभागाच्या सौ. सिमा क्षिरसागर, सुरेश  गोडगे, प्रशांत  भावसार , संतोष .झोटिंग, भाऊसाहेब गटकळ , विकास शिंदे ,गणेश  तुरकणे,अब्दुलरसुल सय्यद,क्रीडा संचालक दीपक जाधव आदीमान्यवर उपस्थित होते.

नेताजी सदनाने२०९ गुण मिळवून  प्रथम तर, शिवाजी सदन २०२ गुण मिळवून व्दितीय,सरदार पटेल सदन १८९ गुण मिळवून तृतीय आणि तानाजी सदनाला १८४ गुण मिळवून चतुर्थ येण्याचा मन मिळाला. या क्रीडा महोत्सवामध्ये १९ वर्षे वयोगटाखालील वैयक्तिक विजेतेपद भागवत कुलथे आणि कु. प्रीती भालेराव यांना तर १७ वर्षे वयोगटाखालील विजेतेपद नोलेश भोये आणि ऋतुजा पाटील यांना आणि १४ वर्षे वयोगटाखालील विजेतेपद तेजस कापडणीस, तर, १२ वारस वयोगटाखालील विजेतेपद आशिष वसावे यांनी मिळविले. प्रवरा पब्लिक स्कुलच्या वतीने या वर्षी  खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “स्पोर्टमन ऑफ द इयर’ म्हणून रणजित डोंगरे आणि “स्पोर्टउमन ऑफ द इयर’ म्हणून कु. अपूर्वा जाधव यांना गौरविण्यात आले.

श्री अरुण वाबळे (माजीवरिष्ठ  पोलीस अधिकारी ) -विद्यार्थी जीवनामध्ये शिस्तीला खूप महत्व असून कठोर मेहनतीशिवाय यशमिळत नसल्याचे सांगितले.

फोटो कॅप्शन :- प्रवरा पब्लिक स्कुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण करताना माजी विद्यार्थी आणि माजी वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री अरुण वाबळे समवेत  संचालक कर्नल डॉ. के. जगन्नाथन, प्राचार्य सयराम  शेळके,उपप्राचार्य  किसनराव   अडसूळ, , श्री मिनास जोसेफ,सौ. मीना जगधने,प्राथमिक विभागाच्या सौ. सिमा क्षिरसागर, सुरेश  गोडगे, प्रशांत  भावसार , संतोष .झोटिंग, भाऊसाहेब गटकळ , विकास शिंदे ,गणेश  तुरकणे,अब्दुलरसुल सय्यद,क्रीडा संचालक दीपक जाधव आदी.